शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!

By admin | Updated: June 30, 2017 01:38 IST

तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी दमदार पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसानंतर पेरणी केली आहे; परंतु पावसाने दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने पेरलेले बियाणे कुजण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली; पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे.मान्सूनच्या पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पिकांचीही पेरणी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात जून महिना संपत आला, तरी पेरणीलायक पाऊस नाही, त्यामुळे ६० टक्क्यांवर पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व कपाशीची छोटी झाडे तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी कापसाचे हे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील बोंदरखेड, पांढरी, सांगळूद, यावलखेड, चाचोंडी, अलियाबाद, बाभूळगाव, डोंगरगाव, सिसा, मासा, गुडधी आदी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी परवा पडलेल्या पावसामुळे पेरणीची तयारी केली, तर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. जमिनीत ओलावाच नसून, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन वरच पडले आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात मूग पिकाची पेरणी केली होती. त्या मुगाची वाढ खुंटली असून, आता मूग, उडीद पेरणीचे दिवस संपले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल, तर कापूसही त्यानंतर काही दिवस पेरता येईल, त्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. काही तालुक्यांत काही गावांच्या शिवारात पाऊस पडल्याने तेथील पिकांना संजीवनी मिळाली; परंतु तेथील पिकांना पावसाचा ताण सहन करावा लागल्याने उत्पादन किती येणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.