शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!

By admin | Updated: June 30, 2017 01:38 IST

तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी दमदार पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसानंतर पेरणी केली आहे; परंतु पावसाने दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने पेरलेले बियाणे कुजण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली; पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे.मान्सूनच्या पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पिकांचीही पेरणी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात जून महिना संपत आला, तरी पेरणीलायक पाऊस नाही, त्यामुळे ६० टक्क्यांवर पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व कपाशीची छोटी झाडे तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी कापसाचे हे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील बोंदरखेड, पांढरी, सांगळूद, यावलखेड, चाचोंडी, अलियाबाद, बाभूळगाव, डोंगरगाव, सिसा, मासा, गुडधी आदी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी परवा पडलेल्या पावसामुळे पेरणीची तयारी केली, तर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. जमिनीत ओलावाच नसून, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन वरच पडले आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात मूग पिकाची पेरणी केली होती. त्या मुगाची वाढ खुंटली असून, आता मूग, उडीद पेरणीचे दिवस संपले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल, तर कापूसही त्यानंतर काही दिवस पेरता येईल, त्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. काही तालुक्यांत काही गावांच्या शिवारात पाऊस पडल्याने तेथील पिकांना संजीवनी मिळाली; परंतु तेथील पिकांना पावसाचा ताण सहन करावा लागल्याने उत्पादन किती येणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.