शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!

By admin | Updated: June 30, 2017 01:38 IST

तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी दमदार पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसानंतर पेरणी केली आहे; परंतु पावसाने दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने पेरलेले बियाणे कुजण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली; पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे.मान्सूनच्या पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पिकांचीही पेरणी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात जून महिना संपत आला, तरी पेरणीलायक पाऊस नाही, त्यामुळे ६० टक्क्यांवर पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व कपाशीची छोटी झाडे तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी कापसाचे हे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील बोंदरखेड, पांढरी, सांगळूद, यावलखेड, चाचोंडी, अलियाबाद, बाभूळगाव, डोंगरगाव, सिसा, मासा, गुडधी आदी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी परवा पडलेल्या पावसामुळे पेरणीची तयारी केली, तर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. जमिनीत ओलावाच नसून, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन वरच पडले आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात मूग पिकाची पेरणी केली होती. त्या मुगाची वाढ खुंटली असून, आता मूग, उडीद पेरणीचे दिवस संपले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल, तर कापूसही त्यानंतर काही दिवस पेरता येईल, त्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. काही तालुक्यांत काही गावांच्या शिवारात पाऊस पडल्याने तेथील पिकांना संजीवनी मिळाली; परंतु तेथील पिकांना पावसाचा ताण सहन करावा लागल्याने उत्पादन किती येणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.