शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा उपोषण!

By admin | Updated: March 29, 2016 02:28 IST

पाण्यासाठी वाघजाळीच्या ग्रामस्थांची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अकोला: महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, गावात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, या मागणीसाठी वाघजाळी येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात देण्यात आला. बाश्रीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथे महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम सन २00८ मध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आले होते. या योजनेच्या कामावर २३ लाख रुपये खर्चही झाला; मात्र योजनेचे काम ४0 टक्के करण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने, गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणारांवर कारवाई करण्यात यावी आणि गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात ग्रामस्थ बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. यावेळी वाघजाळी येथील विकी करवते, गोपाल वाळेकर, आनंद सिरसाट, सनी सिरसाट, रवींद्र सिरसाट, हरिदास टाले, गौतम सिरसाट यांच्या गावातील महिला-पुरुष उपस्थित होते.