शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांतील पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढा

By संतोष येलकर | Updated: April 17, 2023 21:06 IST

आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश : जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या दालनात घेतली बैठक

अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत ६४ गावांतील पाणीटंचाइच्या प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) दालनात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, सर्वसामान्य ग्रामस्थांच्या वेदना समजून, पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी दिले.

अकोला तालुक्यातील ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत आगर, उगवा व घुसर परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या प्रश्नावर आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवार, १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी समजून घेवून तातडीने समजून घेवून तातडीने निकाली काढण्याचे सांगत, जनतेच्या समस्या सोडविण्यासह विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबध्द असून, जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची ग्वाही आ.सावरकर यांनी दिली. ६४ गावांमध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असून, भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्रास होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन, टंचाइग्रस्त गावांमध्ये तातडीने टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पंप बसविण्यात यावे, अशा उपाययोजना करण्याचे निर्देशही आ.सावरकर यांनी दिले. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह अकोला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंचांनी वाचला पाणीटंचाइ समस्येचा पाढा आमदार रणधीर सावरकर यांनी पाणीटंचाइ प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थरांनी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमधील पाणीटंचाइ समस्येचा पाढा वाचला.