शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

६४ गावांतील पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढा

By संतोष येलकर | Updated: April 17, 2023 21:06 IST

आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश : जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या दालनात घेतली बैठक

अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत ६४ गावांतील पाणीटंचाइच्या प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) दालनात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, सर्वसामान्य ग्रामस्थांच्या वेदना समजून, पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी दिले.

अकोला तालुक्यातील ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत आगर, उगवा व घुसर परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या प्रश्नावर आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवार, १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी समजून घेवून तातडीने समजून घेवून तातडीने निकाली काढण्याचे सांगत, जनतेच्या समस्या सोडविण्यासह विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबध्द असून, जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची ग्वाही आ.सावरकर यांनी दिली. ६४ गावांमध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असून, भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्रास होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन, टंचाइग्रस्त गावांमध्ये तातडीने टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पंप बसविण्यात यावे, अशा उपाययोजना करण्याचे निर्देशही आ.सावरकर यांनी दिले. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह अकोला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंचांनी वाचला पाणीटंचाइ समस्येचा पाढा आमदार रणधीर सावरकर यांनी पाणीटंचाइ प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थरांनी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमधील पाणीटंचाइ समस्येचा पाढा वाचला.