शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वीज देयक वितरणाचा घोळ

By admin | Updated: May 18, 2017 00:57 IST

देयक नाही, तर पैसे भरणार कसे: वीज ग्राहक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे रिडिंग घेऊन त्यांना वीज देयक वितरित करण्यासाठी महावितरणकडून एका संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे; परंतु सदर कंत्राटदार संस्थेने वीज देयक वितरणाचा मोठा घोळ घालून ठेवल्याने शहरातील अनेक वीज ग्राहकांना देयके मिळतच नसल्याचे वास्तव आहे. वीज देयकच नाही, तर महावितरणकडे कोणत्या आधारावर पैसे भरणार आणि पैसे भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित होणार, अशा संभ्रमात शहरातील वीज ग्राहक सापडले आहेत.महावितरणकडून वीज ग्राहकांना अखंडितपणे वीज पुरवठा केला जातो. या वीज वापरापोटी त्यांच्याकडून देयकही वसूल केले जाते. ग्राहकांनी किती युनिट वीज वापर केला, याचे मीटर रिडिंग घेऊन त्यानुसार वीज देयके पाठविली जातात. वीज ग्राहकांच्या मीटरमधील युनिटचे रिडिंग घेणे व ती माहिती महावितरणकडे सादर करणे, तसेच महावितरणकडून मिळालेली वीज देयके, मीटर क्रमांकानुसार त्या-त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या कामासाठी महावितरणकडून कंत्राट दिले जाते. गतवर्षी अमरावती येथील एका एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. त्या एजन्सीनेही वीज देयक वितरणात मोठा घोळ घालून ठेवला होता. आता नवीन आर्थिक वर्षात एका बचत गटाला हे कंत्राट देण्यात आले आहे. सदर कंत्राटदार बचत गटाकडून तरी देयक वितरणाच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली. शहरातील मुख्यत्वे जठारपेठ, खेळकर नगर, जवाहर नगर, रणपिसे नगर, राऊतवाडी, सावंतवाडी, उमरी या भागातील वीज ग्राहकांना गत दोन महिन्यांपासून वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वेळेवर वीज देयक मिळत नसल्याने अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. मुदतीच्या आत देयक भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिस पाठविल्या जातात. वीज देयकेच प्राप्त झाले नाही, तर पैसे भरणार कसे, असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.महावितरण म्हणते, ग्राहक सुविधा केंद्रावर या!वीज देयक मिळत नसल्याने अनेक वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वापरलेल्या विजेचे पैसे प्रामाणिकपणे भरणारे वीज ग्राहक वीज देयकांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करतात; परंतु त्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नाही. वीज देयक मिळाले नाही, तर ते महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्रांवरून घेऊन जा किंवा वीज बिलाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करा, असे सांगण्यात येते.महावितरणलाही फटकाशहरात प्रामाणिकपणे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत वीज बिल पोहोचलेच नाही, तर ते पैसे भरणार कसे, एकीकडे वसुलीसाठी मोहिमा राबविल्या जातात, तर दुसरीकडे ग्राहकांपर्यंत देयकच पोहोचत नाही. यामुळे महावितरणलाही आर्थिक फटका बसतो; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.