शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

वीज देयक वितरणाचा घोळ

By admin | Updated: May 18, 2017 00:57 IST

देयक नाही, तर पैसे भरणार कसे: वीज ग्राहक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे रिडिंग घेऊन त्यांना वीज देयक वितरित करण्यासाठी महावितरणकडून एका संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे; परंतु सदर कंत्राटदार संस्थेने वीज देयक वितरणाचा मोठा घोळ घालून ठेवल्याने शहरातील अनेक वीज ग्राहकांना देयके मिळतच नसल्याचे वास्तव आहे. वीज देयकच नाही, तर महावितरणकडे कोणत्या आधारावर पैसे भरणार आणि पैसे भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित होणार, अशा संभ्रमात शहरातील वीज ग्राहक सापडले आहेत.महावितरणकडून वीज ग्राहकांना अखंडितपणे वीज पुरवठा केला जातो. या वीज वापरापोटी त्यांच्याकडून देयकही वसूल केले जाते. ग्राहकांनी किती युनिट वीज वापर केला, याचे मीटर रिडिंग घेऊन त्यानुसार वीज देयके पाठविली जातात. वीज ग्राहकांच्या मीटरमधील युनिटचे रिडिंग घेणे व ती माहिती महावितरणकडे सादर करणे, तसेच महावितरणकडून मिळालेली वीज देयके, मीटर क्रमांकानुसार त्या-त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या कामासाठी महावितरणकडून कंत्राट दिले जाते. गतवर्षी अमरावती येथील एका एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. त्या एजन्सीनेही वीज देयक वितरणात मोठा घोळ घालून ठेवला होता. आता नवीन आर्थिक वर्षात एका बचत गटाला हे कंत्राट देण्यात आले आहे. सदर कंत्राटदार बचत गटाकडून तरी देयक वितरणाच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली. शहरातील मुख्यत्वे जठारपेठ, खेळकर नगर, जवाहर नगर, रणपिसे नगर, राऊतवाडी, सावंतवाडी, उमरी या भागातील वीज ग्राहकांना गत दोन महिन्यांपासून वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वेळेवर वीज देयक मिळत नसल्याने अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. मुदतीच्या आत देयक भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिस पाठविल्या जातात. वीज देयकेच प्राप्त झाले नाही, तर पैसे भरणार कसे, असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.महावितरण म्हणते, ग्राहक सुविधा केंद्रावर या!वीज देयक मिळत नसल्याने अनेक वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वापरलेल्या विजेचे पैसे प्रामाणिकपणे भरणारे वीज ग्राहक वीज देयकांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करतात; परंतु त्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नाही. वीज देयक मिळाले नाही, तर ते महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्रांवरून घेऊन जा किंवा वीज बिलाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करा, असे सांगण्यात येते.महावितरणलाही फटकाशहरात प्रामाणिकपणे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत वीज बिल पोहोचलेच नाही, तर ते पैसे भरणार कसे, एकीकडे वसुलीसाठी मोहिमा राबविल्या जातात, तर दुसरीकडे ग्राहकांपर्यंत देयकच पोहोचत नाही. यामुळे महावितरणलाही आर्थिक फटका बसतो; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.