शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाला ग्रहण लागण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:20 IST

Akola Municipal Corporation घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारला जाणारा ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागण्याची दाट चिन्हं आहेत.

ठळक मुद्दे२०० टन किंवा त्यापेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन हाेणे आवश्यक आहे.दरराेज १०० टनही कचऱ्याचे संकलन हाेत नसल्याची माहिती आहे.

अकाेला: शहरातून निघणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारला जाणारा ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागण्याची दाट चिन्हं आहेत. भाेड येथील ‘त्या’जागेवरील खड्डा नव्हे तर खदान बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन काेट्यवधी रुपयांचा चुराडा करणार असल्याने ही मनमानी थांबवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने बाह्या वर खाेचल्याची माहिती आहे. या प्रकल्पाला ग्रहण लागल्यास जबाबदार काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत सन २०१५ पासून केंद्र शासनाकडून महापालिकेला वर्षाकाठी काेट्यवधींचा निधी प्राप्त हाेत आहे. या प्राप्त निधीतून मनपाने साफसफाइच्या उपाययाेजनांवर केलेला खर्च पाहता केंद्राच्या निधीची निव्वळ उधळपट्टी केली जात असल्याचे दिसत आहे. असाच काहीसा प्रकार मनपा प्रशासनाने घनकचऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या ४५ काेटींच्या प्रकल्पासंदर्भात केल्याचे समाेर आले असून, याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात सत्ताधारी भाजप आग्रही नसल्याची स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव येथे मनपाचे डम्पिंग ग्राउंड असून, याठिकाणी साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया हाेत नसल्याने परिसरातील जलस्रोत दूषित झाले असून, दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रहिवासी परिसरातील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या उद्देशातून मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये भाेड गावानजिकच्या १९ एकर इ-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी देत २०१७ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाेड येथील उपराेक्त जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात याठिकाणी माेठी खदान असून, त्यातून गाैण खनिजाचे उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले हाेते, हे येथे उल्लेखनिय.

२०० टन नव्हे १०० टन कचरा!

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून दरराेज किमान २०० टन किंवा त्यापेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन हाेणे आवश्यक आहे. या मुद्यावर प्रशासनाकडून शासनाची व काही कंपन्यांची दिशाभूल करीत शहरात २०० टनपेक्षा अधिक कचरा जमा हाेत असल्याची माहिती दिली. वास्तविक पाहता दरराेज १०० टनही कचऱ्याचे संकलन हाेत नसल्याची माहिती आहे, यामुळे प्रकल्प कार्यान्वित झाला तरी त्याची कचऱ्याची गरज कशी भागणार, हा माेठा प्रश्न आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला