शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाला ग्रहण लागण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:20 IST

Akola Municipal Corporation घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारला जाणारा ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागण्याची दाट चिन्हं आहेत.

ठळक मुद्दे२०० टन किंवा त्यापेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन हाेणे आवश्यक आहे.दरराेज १०० टनही कचऱ्याचे संकलन हाेत नसल्याची माहिती आहे.

अकाेला: शहरातून निघणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारला जाणारा ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागण्याची दाट चिन्हं आहेत. भाेड येथील ‘त्या’जागेवरील खड्डा नव्हे तर खदान बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन काेट्यवधी रुपयांचा चुराडा करणार असल्याने ही मनमानी थांबवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने बाह्या वर खाेचल्याची माहिती आहे. या प्रकल्पाला ग्रहण लागल्यास जबाबदार काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत सन २०१५ पासून केंद्र शासनाकडून महापालिकेला वर्षाकाठी काेट्यवधींचा निधी प्राप्त हाेत आहे. या प्राप्त निधीतून मनपाने साफसफाइच्या उपाययाेजनांवर केलेला खर्च पाहता केंद्राच्या निधीची निव्वळ उधळपट्टी केली जात असल्याचे दिसत आहे. असाच काहीसा प्रकार मनपा प्रशासनाने घनकचऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या ४५ काेटींच्या प्रकल्पासंदर्भात केल्याचे समाेर आले असून, याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात सत्ताधारी भाजप आग्रही नसल्याची स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव येथे मनपाचे डम्पिंग ग्राउंड असून, याठिकाणी साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया हाेत नसल्याने परिसरातील जलस्रोत दूषित झाले असून, दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रहिवासी परिसरातील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या उद्देशातून मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये भाेड गावानजिकच्या १९ एकर इ-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी देत २०१७ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाेड येथील उपराेक्त जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात याठिकाणी माेठी खदान असून, त्यातून गाैण खनिजाचे उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले हाेते, हे येथे उल्लेखनिय.

२०० टन नव्हे १०० टन कचरा!

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून दरराेज किमान २०० टन किंवा त्यापेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन हाेणे आवश्यक आहे. या मुद्यावर प्रशासनाकडून शासनाची व काही कंपन्यांची दिशाभूल करीत शहरात २०० टनपेक्षा अधिक कचरा जमा हाेत असल्याची माहिती दिली. वास्तविक पाहता दरराेज १०० टनही कचऱ्याचे संकलन हाेत नसल्याची माहिती आहे, यामुळे प्रकल्प कार्यान्वित झाला तरी त्याची कचऱ्याची गरज कशी भागणार, हा माेठा प्रश्न आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला