शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राज्यात घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा समावेश आहे. २०१६ ...

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा समावेश आहे. २०१६ मध्ये शाैचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील नऊ शहरांची निवड केली. तसेच ‘डीपीआर’तयार करण्यासाठी शासनस्तरावरून मार्स नामक एजन्सीची नियुक्ती केली हाेती. एजन्सीने तयार केलेल्या अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मान्यता प्रदान करीत नागपूर येथील नीरी संस्थेने प्रकल्पांचे मूल्यांकन केले. सदर प्रस्तावांना तत्कालीन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मंजुरी देत नऊ शहरांसाठी १७२ काेटी ५१ लक्षच्या प्रकल्पांवर शिक्कामाेर्तब केले. त्यानंतर नागरी स्वायत्त संस्थांच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असता आता तत्कालीन शासनाने मंजूर केलेल्या ‘डीपीआर’मध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा आक्षेप नगरसेवकांनी नाेंदवला आहे. तसेच निविदा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा प्रकार समाेर येताच कार्यारंभ आदेश स्वीकारलेल्या कंत्राटदारांनी मागील तीन महिन्यांपासून प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात केली नसल्याचे समाेर आले आहे.

नागरी स्वायत्त संस्था संभ्रमात

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या निविदा मंजूर हाेऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून नगरसेवकांनी ‘डीपीआर’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी यामध्ये तांत्रिक दाेष असल्याचे आढळून आल्यामुळे आता नागरी स्वायत्त संस्थाही संभ्रमात सापडल्या आहेत.