शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

घनकचरा व्यवस्थापन कागदावर; समितीचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:16 IST

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ‘आॅगस्ट क्रांती मोहिमे’नंतर आता शासनाने राज्यस्तरीय नियंत्रण समितीचे गठन केले असून यामध्ये शहर विकास विभागाचे सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह पर्यावरण विभागाच्या सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासाठी ५०० टन कचºयाची अट पाहता ‘ड’वर्ग महापालिकांसमोर कचरा जमा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी महापालिकांना १ मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एप्रिल २०१८ पर्यंत शहरात निर्माण होणाºया कचºयापैकी किमान ८० टक्के कचºयाचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करण्याचे शासनाचे निर्देश होते. विलगीकरण केलेल्या कचºयापासून विकेंद्रित अथवा केंद्रित पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रक्रिया प्रकल्प न सुरू केल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा शासनाने दिला होता. त्यानंतर जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यादरम्यान १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’मोहिम राबवण्याचे निर्देश होते. एकूणच घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर शासनाकडून वारंवार दिशा निर्देश दिले जात असले तरी दुसरीकडे केंद्राच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पांतर्गत कचºयावर प्रक्रियेसाठी ५०० टन कचºयाची अट नमुद केली आहे. ‘ड’वर्ग महापालिकांमध्ये दैनंदिन २०० ते २५० टन कचरा निघत असल्याने केंद्राची ५०० टन कचºयाची अट शिथील करण्याची मागणी महापालिकांच्या स्तरावर होत आहे. ही अट शिथील न झाल्यास अनेक महापालिकांना केंद्र शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासून वंचित राहावे लागण्याची चिन्हं आहेत.महिन्यातून दोनवेळा आढावाशासनाने गठीत केलेल्या समितीकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर महापालिका, नगर पालिकांचा महिन्यातून दोन वेळा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये स्वायत्त संस्थांना भेडसावणाºया समस्यांचे निराकरण केले जाईल.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न