शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

घनकचरा व्यवस्थापन कागदावर; समितीचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:16 IST

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ‘आॅगस्ट क्रांती मोहिमे’नंतर आता शासनाने राज्यस्तरीय नियंत्रण समितीचे गठन केले असून यामध्ये शहर विकास विभागाचे सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह पर्यावरण विभागाच्या सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासाठी ५०० टन कचºयाची अट पाहता ‘ड’वर्ग महापालिकांसमोर कचरा जमा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी महापालिकांना १ मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एप्रिल २०१८ पर्यंत शहरात निर्माण होणाºया कचºयापैकी किमान ८० टक्के कचºयाचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करण्याचे शासनाचे निर्देश होते. विलगीकरण केलेल्या कचºयापासून विकेंद्रित अथवा केंद्रित पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रक्रिया प्रकल्प न सुरू केल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा शासनाने दिला होता. त्यानंतर जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यादरम्यान १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’मोहिम राबवण्याचे निर्देश होते. एकूणच घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर शासनाकडून वारंवार दिशा निर्देश दिले जात असले तरी दुसरीकडे केंद्राच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पांतर्गत कचºयावर प्रक्रियेसाठी ५०० टन कचºयाची अट नमुद केली आहे. ‘ड’वर्ग महापालिकांमध्ये दैनंदिन २०० ते २५० टन कचरा निघत असल्याने केंद्राची ५०० टन कचºयाची अट शिथील करण्याची मागणी महापालिकांच्या स्तरावर होत आहे. ही अट शिथील न झाल्यास अनेक महापालिकांना केंद्र शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासून वंचित राहावे लागण्याची चिन्हं आहेत.महिन्यातून दोनवेळा आढावाशासनाने गठीत केलेल्या समितीकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर महापालिका, नगर पालिकांचा महिन्यातून दोन वेळा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये स्वायत्त संस्थांना भेडसावणाºया समस्यांचे निराकरण केले जाईल.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न