शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली

By रवी दामोदर | Updated: December 9, 2023 18:38 IST

हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढणार

अकोला : जिल्ह्यात गत आठवड्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली असून, ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. यंदा हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामात मान्सूनला तीन आठवडे उशिरा प्रारंभ झाल्याने पेरण्यांना महिनाभर विलंब झाला. त्यामुळे सोयाबीनचा हंगामदेखील लांबल्यानेही रब्बी हंगामाच्या पेरण्या विलंबाने होत असल्याचे सांगण्यात येते. ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसात खंड असल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. यामुळे रब्बी पेरण्यांचा टक्का कमी होता. मात्र, आता अवकाळी पावसाने जमिनीतला ओलावा काही प्रमाणात वाढला. त्यामुळे पेरण्यांची लगबग वाढली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी १ लाख २१ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते, यंदा सुरुवातीला पेरणी थांबली होती, परंतू अवकाळी पावसाने ओलावा वाढल्याने गत आठवड्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७१ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी आटोपली असून, त्यामध्ये सार्वाधिक ५५ हजार ८४६ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. त्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र आहे.

अनेक भागात हरभऱ्याची होणार दुबार पेरणी

रब्बी हंगामात जिल्ह्याचे प्रमुख पीक हरभरा असून, दरवर्षी हरभऱ्याचा पेरा वाढतो. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जमिनीत ओलावा कमी असल्याने काही बगायदार शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परंतू त्यानंतर गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने हरभऱ्यावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर धुके व ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा (कटवर्म) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी