शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली

By रवी दामोदर | Updated: December 9, 2023 18:38 IST

हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढणार

अकोला : जिल्ह्यात गत आठवड्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली असून, ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. यंदा हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामात मान्सूनला तीन आठवडे उशिरा प्रारंभ झाल्याने पेरण्यांना महिनाभर विलंब झाला. त्यामुळे सोयाबीनचा हंगामदेखील लांबल्यानेही रब्बी हंगामाच्या पेरण्या विलंबाने होत असल्याचे सांगण्यात येते. ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसात खंड असल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. यामुळे रब्बी पेरण्यांचा टक्का कमी होता. मात्र, आता अवकाळी पावसाने जमिनीतला ओलावा काही प्रमाणात वाढला. त्यामुळे पेरण्यांची लगबग वाढली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी १ लाख २१ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते, यंदा सुरुवातीला पेरणी थांबली होती, परंतू अवकाळी पावसाने ओलावा वाढल्याने गत आठवड्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७१ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी आटोपली असून, त्यामध्ये सार्वाधिक ५५ हजार ८४६ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. त्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र आहे.

अनेक भागात हरभऱ्याची होणार दुबार पेरणी

रब्बी हंगामात जिल्ह्याचे प्रमुख पीक हरभरा असून, दरवर्षी हरभऱ्याचा पेरा वाढतो. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जमिनीत ओलावा कमी असल्याने काही बगायदार शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परंतू त्यानंतर गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने हरभऱ्यावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर धुके व ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा (कटवर्म) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी