शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली

By रवी दामोदर | Updated: December 9, 2023 18:38 IST

हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढणार

अकोला : जिल्ह्यात गत आठवड्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली असून, ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. यंदा हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामात मान्सूनला तीन आठवडे उशिरा प्रारंभ झाल्याने पेरण्यांना महिनाभर विलंब झाला. त्यामुळे सोयाबीनचा हंगामदेखील लांबल्यानेही रब्बी हंगामाच्या पेरण्या विलंबाने होत असल्याचे सांगण्यात येते. ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसात खंड असल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. यामुळे रब्बी पेरण्यांचा टक्का कमी होता. मात्र, आता अवकाळी पावसाने जमिनीतला ओलावा काही प्रमाणात वाढला. त्यामुळे पेरण्यांची लगबग वाढली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी १ लाख २१ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते, यंदा सुरुवातीला पेरणी थांबली होती, परंतू अवकाळी पावसाने ओलावा वाढल्याने गत आठवड्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७१ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी आटोपली असून, त्यामध्ये सार्वाधिक ५५ हजार ८४६ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. त्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र आहे.

अनेक भागात हरभऱ्याची होणार दुबार पेरणी

रब्बी हंगामात जिल्ह्याचे प्रमुख पीक हरभरा असून, दरवर्षी हरभऱ्याचा पेरा वाढतो. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जमिनीत ओलावा कमी असल्याने काही बगायदार शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परंतू त्यानंतर गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने हरभऱ्यावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर धुके व ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा (कटवर्म) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी