शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:28 IST

सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यूदर ही वाढत आहे. या वाढत्या मृत्यूदराला उशिरा रुग्णालयात दाखल होण्याची मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. लवकर निदान झाले तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबु शकतात. गेल्या सात दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांंची हिस्ट्री तपासली असता, सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र काही प्रमाणात लक्षणे आढळल्यानंतरही काही रुग्ण कोरोनाच्या धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रुग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यासाठी लवकर निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे आवश्यक आहे. लक्षणे दिसताचक्षणी लगेच कोरोना चाचणी केली नाही तर संभाव्य धोका कमी होतो. केवळ कोरोनाच्या धास्तीमुळे घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक लक्षणे आढळल्यावर चाचणीअंती रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना किमान पाच ते सहा दिवस उपचारासाठी मिळाले तरी मृत्यू रोखता येवू शकतात.प्राथमिक लक्षणे दिसून लागताच कोरोनाची चाचणी करुन घ्या. लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास कोरोनाचा प्रभाव फुफ्फूसावर होतो. तेव्हा रुग्णाला वाचविणे मोठे जोखमिचे होते. लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करुन घेतली तर लवकर उपचार सुरु करता येईल.- डॉ. मिनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला