शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:22 IST

अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘

- संतोष येलकरअकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला.शेतकºयांच्या शेतमाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील शेतमालाची निर्यात करण्याकरिता शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून २१ कोटी रुपयांचा ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा मुंबईच्या आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला. त्यावेळी अकोट येथील नरनाळा शेतकरी कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे व आयएनआय कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निर्यातीचा करार झाल्याने अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंबाची निर्यात युरोप व आखाती देशात करण्यात येणार आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्ह्याचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.पायाभूत सुविधा उपलब्ध होणार!शासनाच्या स्मार्ट प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतमाल निर्यातीसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भेंडी, मिरची निर्यातीचा करारही लवकरच!शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यातीचा करारदेखील अकोल्याच्या मोर्णा व्हॅली कंपनीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांचीही निर्यात होणार आहे. 

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंब निर्यातीचा करार मुंबईच्या आयएनआय कंपनीसोबत करण्यात करण्यात आला. स्मार्ट योजनेत जिल्हा समाविष्ट झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.-अशोक अमानकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती