शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:22 IST

अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘

- संतोष येलकरअकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला.शेतकºयांच्या शेतमाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील शेतमालाची निर्यात करण्याकरिता शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून २१ कोटी रुपयांचा ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा मुंबईच्या आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला. त्यावेळी अकोट येथील नरनाळा शेतकरी कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे व आयएनआय कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निर्यातीचा करार झाल्याने अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंबाची निर्यात युरोप व आखाती देशात करण्यात येणार आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्ह्याचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.पायाभूत सुविधा उपलब्ध होणार!शासनाच्या स्मार्ट प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतमाल निर्यातीसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भेंडी, मिरची निर्यातीचा करारही लवकरच!शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यातीचा करारदेखील अकोल्याच्या मोर्णा व्हॅली कंपनीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांचीही निर्यात होणार आहे. 

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंब निर्यातीचा करार मुंबईच्या आयएनआय कंपनीसोबत करण्यात करण्यात आला. स्मार्ट योजनेत जिल्हा समाविष्ट झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.-अशोक अमानकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती