शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुलाच्या बांधकामाऐवजी केले रपट्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST

खेट्री: वसाली, झरंडी मार्गावर पुलाच्या बांधकामाऐवजी अरूंद रपट्याचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रपट्यावरून जड वाहने जात ...

खेट्री: वसाली, झरंडी मार्गावर पुलाच्या बांधकामाऐवजी अरूंद रपट्याचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रपट्यावरून जड वाहने जात नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

स्वातंत्र्यकाळापासून पातूर तालुक्यातील वसाली, झरंडी या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ता नव्हता. त्यामुळे गावात दुचाकी व इतर वाहन गावात जात नव्हते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली. गत काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले;मात्र वसालीनजीक पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असताना तेथे केवळ रपट्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रपट्यावरून एस. टी. बस, ट्रक व इतर जड वाहने जाऊ शकत नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार तक्रार केली, परंतु संबंधितांकडून ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीने दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी वारंवार संपर्क केला असता, होऊ शकला नाही.