शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

सहा घरांना आग; साहित्य खाक

By admin | Updated: May 6, 2015 01:00 IST

मूर्तिजापूूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबांची लाखो रुपयांची हानी.

मूर्तिजापूूर : तालुक्यातील गुंजवाडा येथे शेतकर्‍यांच्या सहा घरांना मंगळवारी आग लागली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. आधीच नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आता आगीत घरातील साहित्य खाक झाले. आगीत धान्य व कुटारही खाक झाले. त्यामुळे शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. गुंजवाडा येथील पात्रे कुटुंबातील पुरुष सदस्य हिरपूर येथे लग्नाला गेले होते. मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आगीत मोहन पात्रे, श्याम पात्रे, राम पात्रे, साहेबराव पात्रे, हिंमतराव पात्रे, सुधाकरराव पात्रे यांच्या घरातील साहित्य खाक झाले. घराच्या बाजूला कुटार ठेवण्यात आले होते. आगीत तीन गंजी चारा, १५ ट्रॉली कुटार खाक झाले. थ्रेशर मशीनचे टायर, वायर आणि इतर साहित्यही जळाले. आगीची माहिती मिळताच मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.