शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 03:01 IST

राज्यात यंत्रणा मात्र सुस्त : अतिवृष्टी, महापुराचे संकट

अकोला : जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्याचे सरासरी तापमान वाढणार असून, त्याचा प्रथम फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यातील दहा जिल्हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये बदलासाठी अनुकूल ठरणाऱ्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे; मात्र सर्वच पातळीवर सामसूम असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुख्यत: अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रव्यांचा असमतोल, वॉटर लॉगिंग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगल व पाण्याची उपलब्धता यावर मोठे परिणाम होणार आहेत. आकस्मिक अतिवृष्टीने महापूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, या घटनांमध्येही वाढ होत आहे. अतिसंवेदनशील जिल्ह्यांत प्रथम क्रमांक नंदुरबारचा आहे. त्यापाठोपाठ धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाने २००८ मध्येच राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडा राज्यांना दिला. त्या आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्याचे निर्देश आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाने दिले. आराखड्यामध्ये वातावरणात होणाºया बदलांचा फटका बसणाºया जिल्ह्यांचा क्रमही ठरविण्यात आला. राज्यातील जिल्ह्याचा संवेदनशील निर्देशांकही ठरला आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन करून जिल्हास्तरीय अनुकूलन आराखडे तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधी प्राप्त करून घेणे, प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, त्यासाठी पर्यावरण व नियोजन विभागाशी समन्वय ठेवण्याचेही बजावण्यात आले; मात्र आराखडाही नाही, अंमलबजावणीही नाही, अशीच स्थिती सर्वत्र असल्याचे चित्र आहे.सर्व विभागांचा समन्वय साधण्याचा प्रयत्नपर्यावरणासंदर्भातील जिल्ह्यातील सांख्यिकीय माहितीनुसार वनविभाग, पर्यावरण विभागाकडून उपाययोजनांना सुरूवात केली जाईल. पुढील काळात उपाययोजना अधिक गतीने करण्यासाठी पाठपुरावा तसेच सर्व विभागांचा समन्वय साधला जाईल.- हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम. 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस