शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 03:01 IST

राज्यात यंत्रणा मात्र सुस्त : अतिवृष्टी, महापुराचे संकट

अकोला : जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्याचे सरासरी तापमान वाढणार असून, त्याचा प्रथम फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यातील दहा जिल्हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये बदलासाठी अनुकूल ठरणाऱ्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे; मात्र सर्वच पातळीवर सामसूम असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुख्यत: अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रव्यांचा असमतोल, वॉटर लॉगिंग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगल व पाण्याची उपलब्धता यावर मोठे परिणाम होणार आहेत. आकस्मिक अतिवृष्टीने महापूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, या घटनांमध्येही वाढ होत आहे. अतिसंवेदनशील जिल्ह्यांत प्रथम क्रमांक नंदुरबारचा आहे. त्यापाठोपाठ धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाने २००८ मध्येच राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडा राज्यांना दिला. त्या आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्याचे निर्देश आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाने दिले. आराखड्यामध्ये वातावरणात होणाºया बदलांचा फटका बसणाºया जिल्ह्यांचा क्रमही ठरविण्यात आला. राज्यातील जिल्ह्याचा संवेदनशील निर्देशांकही ठरला आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन करून जिल्हास्तरीय अनुकूलन आराखडे तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधी प्राप्त करून घेणे, प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, त्यासाठी पर्यावरण व नियोजन विभागाशी समन्वय ठेवण्याचेही बजावण्यात आले; मात्र आराखडाही नाही, अंमलबजावणीही नाही, अशीच स्थिती सर्वत्र असल्याचे चित्र आहे.सर्व विभागांचा समन्वय साधण्याचा प्रयत्नपर्यावरणासंदर्भातील जिल्ह्यातील सांख्यिकीय माहितीनुसार वनविभाग, पर्यावरण विभागाकडून उपाययोजनांना सुरूवात केली जाईल. पुढील काळात उपाययोजना अधिक गतीने करण्यासाठी पाठपुरावा तसेच सर्व विभागांचा समन्वय साधला जाईल.- हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम. 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस