शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’! पाळण्याची पालकमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 09:55 IST

१ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सोमवार, १ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना मांडल्या. त्यानुसार कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरात १ ते ६ जून असे सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असून, या संपूर्ण ‘लॉकडाउन’च्या कालावधीत शहरातील वैद्यकीय सेवा वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय बैठकीत केली. ‘जनता कर्फ्यू’च्या कालावधीत शहरातील कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.शासन व पालकमंत्र्यांच्या आदेशात विरोधाभासराज्यशासनाने लॉकडाउन-४ चे निर्बंध लागू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्य सचिवांच्या मंजूरीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट केले. अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण लॉकडाउन करणे म्हणजे, शासन आदेशाची अवहेलना ठरु शकते. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBacchu Kaduबच्चू कडू