शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अकोल्यात सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’! पाळण्याची पालकमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 09:55 IST

१ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सोमवार, १ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना मांडल्या. त्यानुसार कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरात १ ते ६ जून असे सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असून, या संपूर्ण ‘लॉकडाउन’च्या कालावधीत शहरातील वैद्यकीय सेवा वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय बैठकीत केली. ‘जनता कर्फ्यू’च्या कालावधीत शहरातील कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.शासन व पालकमंत्र्यांच्या आदेशात विरोधाभासराज्यशासनाने लॉकडाउन-४ चे निर्बंध लागू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्य सचिवांच्या मंजूरीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट केले. अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण लॉकडाउन करणे म्हणजे, शासन आदेशाची अवहेलना ठरु शकते. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBacchu Kaduबच्चू कडू