शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सहा दिवसाचा जनता कर्फ्यू आता ‘स्वयंस्फूर्त’; शासनाने दिली नाही मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:03 IST

स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी केले.दरम्यान, शहरात १ ते ६ जून या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला; मात्र ३१ मे रोजी सायंकाळपर्यंत या प्रस्तावाला मुख्य सचिवांकडून मान्यता प्राप्त झाली नाही.अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करणे अवघड होणार आहे. त्यानुषंगाने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यावर एकमत झाले होते. त्यानुसार १ ते ६ जून या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे व आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी केले. असे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्वयंस्फूर्तीने 'जनता कर्फ्यू'मध्ये सहभागी व्हा -जिल्हाधिकारीपालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता , 'जनता कर्फ्यू ' मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. दरम्यान, अकोला शहरासाठी २१ मे रोजी काढण्यात आलेल आदेश कायम ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वंचित आघाडीचा ‘जनता कर्फ्यू’ला विरोधपालकमंत्री यांनी १ ते ६ जूनपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असल्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, २८ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीत जनता कर्फ्यूच्या प्रस्तावास विरोध केला होता. आधी गरीब आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची जेवणाची व्यवस्था करावी तसेच वाढीव चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि संस्थात्मक विलगीकरण, रुग्णांच्या वॉर्डमध्ये उत्तम उपचार आणि इतर व्यवस्था करावी, पीके व्हीमध्ये रुग्णांचे हाल थांबवावे, अशा सूचना केल्या होत्या; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. जनता कर्फ्यूने काहीही साध्य होणार नाही. राज्य सरकारने अकोला प्रशासनास तोंडावर पाडले असल्याचे आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याBacchu Kaduबच्चू कडू