शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

साहेब, पिकांचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे साहेब, पिकांचे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे साहेब, पिकांचे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाइच्या मदतीचा आधार द्या, अशा शब्दात रामगाव येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना रविवारी साकडे घातले.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यामध्ये रामगाव येथील पीक नुकसानाची पाहणी करीत, शेतकऱ्यांशी चर्चा करून व्यथा जाणून घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे गावातील सर्वच शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पीक नुकसान भरपाइची मदत देताना केवळ नदी व नाल्याकाठच्या पीक नुकसानाचा विचार न करता, पिकांचे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. यावेळी रामगावच्या सरपंच तायडे, शेतकरी शिवाजीराव भरणे, अरुण लोडम, सुभाष भोगेख............... मुकिंदा गावंडे आदी शेतकऱ्यांसह तलाठी, कृषी सहायक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.