शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजारावर सिंचन विहिरींची कामे रखडली

By admin | Updated: November 13, 2014 23:43 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे?

संतोष येलकर/अकोलाधडक सिंचन विहिर योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असला तरी; अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि वर्धा, अशा एकूण जिल्ह्यांमध्ये १६ हजार ३७८ सिंचन विहिरींची कामे अद्याप सुरुच झाली नाहीत. हजारो सिंचन विहिरींची कामे बाकी असताना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सन २00९ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहिर योजना सुरु करण्यात आली. या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात १ हजार ३00 सिंचन विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रूपयांचा निधीदेखिल उपलब्ध करुन देण्यात आला; मात्र गेल्या पाच वर्षात धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले नाही. दरम्यान, धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत रखडलेल्या विहिरींपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पभुधारक शेतकरी लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींचा समावेश गत फेब्रुवारीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आला. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत प्रत्येकी २ लाख ५0 हजार रूपये, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येकी ३ लाखांचे अनुदान दिले जाते. सिंचन विहिरींच्या कामांसाठी निधीची कमतरता नसतानाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत ३ हजार ३२६ आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १३ हजार ५२ सिंचन विहिरींची कामे प्रलंबीत होती. कामाची हिच स्थिती राहीली तर, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी शासनामार्फत धडक सिंचन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा कार्यक्रम विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहे. सिंचन विहिरींची प्रलंबित असलेली कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे रोजगारहमी योजनेचे विभागीय उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी स्पष्ट केले. योजना व जिल्हानिहाय प्रलंबित सिंचन विहिरींची कामे!जिल्हा            धडक सिंचन योजना             मग्रारोहयो अमरावती            ५५0                                   ३७३३अकोला               ३१५                                    २४३९यवतमाळ          १८१९                                     ३१५५बुलडाणा              ११0                                     २४३२वाशिम                 ४१६                                     १२९३वर्धा                     ११६                                     ११६0.......................................एकूण                   ३३२६                                   १३0५२