शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

शिवसेनेचा ‘एसबीआय’ला घेराव

By admin | Updated: May 17, 2017 14:58 IST

शेतकर्‍यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला.

अकोला:शेतकर्‍यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ह्यएसबीआयह्णचे विभागीय व्यवस्थापक मुंकूद उपासने यांना शेतकर्‍यांचे हक्काचे पैसे तातडीने द्या,अन्यथा बँकेचे कामकाज बंद पाडू असा सज्जड दम भरताच विभागीय व्यवस्थापकांनी क्षणाचाही विलंब न करता शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे देण्याचे निर्देश जारी केले.शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असली तरी शेतात काम करणार्‍या मजूरांना पैसे देण्यासाठी शेतकर्‍यांचे खिसे रिकामेच असल्याची परिस्थिती आहे. तूर खरेदीसाठी नाफेडने आखडता हात घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरात हजारो क्विंटल तूर पडून आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ज्या शेतकर्‍यांनी २७00 रूपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन आणि नाफेडकडे तूर विक्री केली, त्यांचे पैसे बँकेत जमा झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाभरातील शाखांमधून आवश्यकतेनुसार पैसे दिले जात नसल्यामुळे शेतकर्‍यांसमोर भलतेच संकट उभे ठाकले आहे. शेतीची मशागत केल्यानंतर मजूरांचे पैसे देण्यास शेतकर्‍यांजवळ पैसाच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. बँकेक डे गरजेनुसार २५-३0 हजार रूपयांची मागणी केली असता केवळ ३ हजार किंवा ५ हजार रूपये शेतकर्‍यांच्या हातावर टिकवून त्यांची बोळवण केली जात आहे. शेतकर्‍यांप्रति बँकांच्या उदासिन आणि निष्क्रीय धोरणामुळे जिल्हाभरातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकर्‍यांनी ही कैफियत शिवसेनेकडे मांडल्यानंतर बुधवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात ह्यस्टेट बँक ऑफ इंडियाह्णच्या मुख्य शाखेवर हल्लाबोल करण्यात आला. मुख्य शाखेचे विभागीय व्यवस्थापक मुकूंद उपासने यांना घेराव घालून कोणाच्या आदेशानुसार शेतकर्‍यांना कमी रक्कम देण्यात येत आहे,अशी जिल्हाप्रमुख देशमुख यांनी विचारणा केल्यानंतर अशा प्रकारचे कोणाचेही आदेश नसल्याचे विभागीय व्यवस्थापकांनी सांगितले. शेतकर्‍यांची अडवणूक करणे बंद करा, अन्यथा या क्षणापासूनच बँकेचे कामकाज बंद पाडू असा दम जिल्हाप्रमुखांनी भरताच विभागीय व्यवस्थापक उपासने यांनी जिल्हाभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला पत्र लिहून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे अदा करण्याचे निर्देश दिले.