शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलचा ‘एनएसएस’मध्ये समावेश

By admin | Updated: July 13, 2015 01:12 IST

जनजागृतीसाठी ११ विद्यापीठांना निर्देश

अकोला: सिकलसेल या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने घेतला. याकरिता ह्यएनआरएचएमह्ण व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मदतीने जनजागृती करण्याचे निर्देश राज्यातील ११ विद्यापीठांना देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नंदूरबार ते पश्‍चिम विदर्भात सिकलसेल या क्लिष्ट आजाराची पाळेमुळे पसरत चालली आहेत. सिकलसेलच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व विदर्भात असताना उपचाराचे केंद्र नागपूरऐवजी मुंबईमध्ये कार्यान्वित आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असून, विदर्भातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जावे लागते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमार्फत (एनआरएचएम) सिकलसेल रुग्णांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला, तरी त्याचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचे चित्र आहे. सिकलसेलचा प्रसार महाविद्यालयातील युवा-युवतींकडून लग्न केल्यानंतर नकळतपणे होत असल्याने यावर उपाय म्हणून या आजाराबद्दल जनजागृती करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात (एनएसएस) सिकलसेल जागृतीचा समावेश करण्यात आला असून, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंंंत सिकलसेल प्रतिबंधाची माहिती देणे शक्य होणार आहे. तसे निर्देश राज्यातील ११ विद्यापीठांना देण्यात आले आहेत. *अहवाल सादर करावा लागेल संबंधित विद्यापीठांनी सिकलसेलच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया यांची मदत घेऊन तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, प्रदर्शनीचे आयोजन व माहितीपत्रकाच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आहेत. वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा, छायाचित्र, वर्तमानपत्रातील कात्रण आदी अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर करावा लागेल.