शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

मूर्तिजापूर येथील नाफेड खरेदी केंद्रात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

मूर्तिजापूर : ‘नाफेड’ने एक महिन्यापासून खरेदी शुभारंभ करुनही शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकला नसल्याने येथील खरेदी केंद्रात शुकशुकाट दिसून आला. ...

मूर्तिजापूर : ‘नाफेड’ने एक महिन्यापासून खरेदी शुभारंभ करुनही शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकला नसल्याने येथील खरेदी केंद्रात शुकशुकाट दिसून आला. आतापर्यंत एक क्विंटल ही खरेदी झाली नाही. भावाची तफावत असल्याने येथील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतकरी फिरकलाच नसल्याचे चित्र आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात शेतकरी माल विक्रीसाठी आणत असलेल्या धान्यामध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन, हरभरा गहू या धान्यांचा समावेश आहे.

तालुक्यातील हातातोंडाशी आलेल्या शेकडो हेक्टर शेतीवरील गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, यासाठी शासनस्तरावर मदत मिळेल या आशेवर जीवन जगल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही.

गतवर्षी एप्रिल महिन्यात नोंदणी सुरु होऊनही ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी करुन २ हजार ४०० शेतकऱ्यांनी ४४ हजार क्विंटल हरभरा विकला होता. तूर ६ हजार, हरभरा ५ हजार १०० या हमी भावाने खरेदी करण्यात येते चाळणी प्रक्रिया असल्याने त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे उत्कृष्ट धान्यच शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही, त्यातही ७/१२ इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. ऐवढे करुन ही चुकारे ऐन वेळी होत नाही, तिथे मालाची चाळणी प्रक्रिया होऊनही शासकीय भावातच चांगला माल खुल्या बाजारात विकल्या जात असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे का जायचे असा सवालही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण व्यवहार शेतीच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या

शेतकऱ्यांवर पेरणीपूर्व मशागत व रब्बी पेरणीचे दिवस जवळ आल्याने तसेच मुलाच्या परीक्षा फी व शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला शेतीमाल नगदी पैशाने बाजार समितीत विकावा लागतो. असे असल्याने नाफेडकडे खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तेही शेतकरी माल शासकीय खरेदी केंद्रात देतील की नाही यात शंका आहे.

----------------

खरेदी केंद्र पडले ओस

मूर्तिजापूर येथील शासकीय धान्य खरेदी केंद्र २० मार्च रोजी सुरु करण्यात आले आहे. माल विक्रीसाठी शेतकरी नोंदणी करीत असले तरी कुठलाही शेतकरी अद्यापपर्यंत खरेदी केंद्रावर फिरकलाच नाही. यापूर्वी तूर विक्रीसाठी २ हजार ७०० तर हरभरा विक्रीसाठी १७४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय खरेदी एक महिना लवकर सुरु झाली. त्यासाठी शेतकऱ्यांना मेसेजही पाठविण्यात आले आहेत, परंतु आजपर्यंत प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर एकही शेतकरी फिरकला नसल्याने खरेदी केंद्रच ओस पडले आहे.

----------------------------------------

शासकीय धान्य खरेदीसाठी आमच्याकडे आतापर्यंत १ हजार ७४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धान्य विक्रीसाठी आणावे असे संदेश दिल्या गेले आहेत. परंतु आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने माल विक्रीसाठी आणलेला नाही.

डी. एन. मुळे, व्यवस्थापक, खरेदी विक्री, मूर्तिजापूर