शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

श्रीराम नवमी उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

मराठी नववर्षाचे रक्तदानाने स्वागत करा अकोला : सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात रक्तदानाने ...

मराठी नववर्षाचे रक्तदानाने स्वागत करा

अकोला : सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात रक्तदानाने करावी. नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जठारपेठेतील डाॅ. हेडगेवार रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे, असे आयोजकांनी केले आहे.

जिल्ह्यात २०३ बेवारस वाहने

अकोला : जिल्ह्यातील विविध पाेलीस स्टेशनला २०३ बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या बेवारस वाहनांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यातील बेवारस वाहन मालकांचा शोध घेऊन वाहनाची ओळख पटवून वाहने परत देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वाहन मालकांनी वाहनांची कंपनी, पासिंग नंबर, इंजिन नंबर, चेचिस नंबर याबाबतची पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आरटीई प्रवेश : पालकांना एसएमएस

अकोला : आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठी पहिली सोडत ७ एप्रिलला ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मोबाइल फोनवर एसएमएस येणार आहेत. परंतु त्यानंतर पालकांनीही संकेतस्थळाला भेट देऊन खातरजमा करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ७२६ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. आरटीई नोंदणीकृत शाळांची संख्या १ हजार ९६० आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य

अकोला: राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबर १० एप्रिलपासून ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. याबाबत राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाही नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानंतरही नागरिक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. विना मास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासनाने, पोलिसांनी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईची धडका सुरू केला आहे. सोमवारी मनपाने २४ जणांविरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला.