शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

स्पर्धेतून निर्माण झालेले चैतन्य कामातून दाखवा!

By admin | Updated: January 19, 2015 02:47 IST

विभागीय आयुक्तांचे आवाहन; अकोला जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप.

अकोला: क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेला जोश व चैतन्य कर्मचार्‍यांनी कामातून दाखवावे आणि कामाचा दर्जा उंचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी रविवारी येथे केले. अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, देवानंद गणोरकर, रवींद्र गोपकर, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे राजूरकर म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर तणाव असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धेतून कर्मचार्‍यांमध्ये जोश आणि चैतन्य निर्माण झाले असेल, असे सांगत स्पर्धेतून निर्माण झालेल्या चैतन्यातून आता कर्मचार्‍यांनी काम करावे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्याची गरज असून, त्यासाठी कर्मचार्‍यांनी काम करण्याची गरज आहे. कामाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांंची गरज असून, या क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेल्या उज्रेतून कर्मचार्‍यांनी काम करावे आणि कामाच्या दृष्टीने अमरावती विभाग किमान चौथ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी मांडले. कर्मचार्‍यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांंचे आयोजन झाले पाहिजे, अशी अपेक्षा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी, तर संचालन प्रकाश मानकर व मोंटू सिंग यांनी केले. आभार डॉ. मनोहर तुपकर यांनी मानले.