शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचा विचार करावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:04 IST

अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिला.

अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिला. त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी आंतरराष्ट्रीय परिणामांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.शिवजयंती निमित्त भारीप-बमसंच्यावतीने अकोला येथे काढण्यात आलेल्या रॅलीला झेंडी देण्यासाठी आलेल्या अ‍ॅड. आंबेडकरांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर भाष्य करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की भारतासह अमेरिकेने आर्थिक नाड्या आवळल्यामुळे पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या स्थितीत येऊन पोहचला आहे. पाकिस्तानला या दिवाळखोरीतून सावरण्याची संधी मिळू नये, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिलेली २० मिलियन डॉलरची आर्थिक मदत रोखण्यासाठी भारताने प्रयत्न करावयास हवे होते. अमेरिकेने पाकची आर्थिक मदत रोखलीच आहे. इतर देशांनीही पाकला मदत करू नये यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.आर्थिक कोंडी करणे हा पाकविरोधातील सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगतानाच त्या देशाला जरब बसावी यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईचाही विचार करावा. पुलवामा दहशतवादी हल्ला हा सिमेपलीकडून नव्हे तर भारताच्या भूमितच झालेला असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी भारताने त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, याचा सारासार विचारही करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंबेडकर यांनी केले. पंतप्रधांनानी दहतवादी हल्ल्यासंदर्भातील माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसोबत ‘शेअर ’ केली पाहिजे, असे आपले मत असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान