शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 10:55 IST

CoronaVirus In Akola मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे २८ दिवसांत ४,३८६ रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू सप्टेंबरपेक्षाही घातक ठरला फेब्रुवारी महिना

अकोला : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत फेब्रुवारीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने अकोला महापालिका कार्यक्षेत्रासह मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात कोरोनाचा कहर दिसून आला. गत वर्ष सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक ३,४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, मात्र त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. मृत्युदरही कमी होऊ लागला होता. दरम्यान दिवाळीची बाजारपेठ आणि त्यानंतर लग्नसमारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ लागला. जानेवारीत कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा सुरुवात झाली, मात्र त्याची खरी तीव्रता १५ फेब्रुवारीनंतर दिसून आली. फेब्रुवारी महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत मृतकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी असली, तरी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गत महिनाभरात ४ हजार ३८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन अकरा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या महिन्यात घटले आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास येत्या काळात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ

१ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी

एकूण रुग्ण - ८८१ - ३,५०५

मृत्यू - ८ - २३

बरे झालेले रुग्ण - ६२६ - ८७७

ॲक्टिव्ह - ९४७ - २८५८

 

केवळ ३४ टक्के रुग्णांनाच डिस्चार्ज

फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले. महिनाभरात केवळ १५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच गत महिनाभरात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ३४ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही स्थिती चांगली होती. सप्टेंबरमध्ये एकूण रुग्णांच्या ७२ टक्के म्हणजेच २४६९ एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

मृत्युदरावर नियंत्रण

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्युदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील मृत्युदर केवळ ०.७० टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ३६७ जणांचा बळी गेला असून, हा मृत्युदर २.२ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जवळपास एक टक्क्यांनी मृत्युदर घसरला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या