शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 10:55 IST

CoronaVirus In Akola मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे २८ दिवसांत ४,३८६ रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू सप्टेंबरपेक्षाही घातक ठरला फेब्रुवारी महिना

अकोला : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत फेब्रुवारीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने अकोला महापालिका कार्यक्षेत्रासह मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात कोरोनाचा कहर दिसून आला. गत वर्ष सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक ३,४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, मात्र त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. मृत्युदरही कमी होऊ लागला होता. दरम्यान दिवाळीची बाजारपेठ आणि त्यानंतर लग्नसमारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ लागला. जानेवारीत कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा सुरुवात झाली, मात्र त्याची खरी तीव्रता १५ फेब्रुवारीनंतर दिसून आली. फेब्रुवारी महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत मृतकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी असली, तरी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गत महिनाभरात ४ हजार ३८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन अकरा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या महिन्यात घटले आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास येत्या काळात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ

१ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी

एकूण रुग्ण - ८८१ - ३,५०५

मृत्यू - ८ - २३

बरे झालेले रुग्ण - ६२६ - ८७७

ॲक्टिव्ह - ९४७ - २८५८

 

केवळ ३४ टक्के रुग्णांनाच डिस्चार्ज

फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले. महिनाभरात केवळ १५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच गत महिनाभरात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ३४ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही स्थिती चांगली होती. सप्टेंबरमध्ये एकूण रुग्णांच्या ७२ टक्के म्हणजेच २४६९ एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

मृत्युदरावर नियंत्रण

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्युदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील मृत्युदर केवळ ०.७० टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ३६७ जणांचा बळी गेला असून, हा मृत्युदर २.२ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जवळपास एक टक्क्यांनी मृत्युदर घसरला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या