शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 10:55 IST

CoronaVirus In Akola मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे २८ दिवसांत ४,३८६ रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू सप्टेंबरपेक्षाही घातक ठरला फेब्रुवारी महिना

अकोला : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत फेब्रुवारीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने अकोला महापालिका कार्यक्षेत्रासह मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात कोरोनाचा कहर दिसून आला. गत वर्ष सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक ३,४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, मात्र त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. मृत्युदरही कमी होऊ लागला होता. दरम्यान दिवाळीची बाजारपेठ आणि त्यानंतर लग्नसमारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ लागला. जानेवारीत कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा सुरुवात झाली, मात्र त्याची खरी तीव्रता १५ फेब्रुवारीनंतर दिसून आली. फेब्रुवारी महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत मृतकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी असली, तरी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गत महिनाभरात ४ हजार ३८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन अकरा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या महिन्यात घटले आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास येत्या काळात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ

१ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी

एकूण रुग्ण - ८८१ - ३,५०५

मृत्यू - ८ - २३

बरे झालेले रुग्ण - ६२६ - ८७७

ॲक्टिव्ह - ९४७ - २८५८

 

केवळ ३४ टक्के रुग्णांनाच डिस्चार्ज

फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले. महिनाभरात केवळ १५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच गत महिनाभरात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ३४ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही स्थिती चांगली होती. सप्टेंबरमध्ये एकूण रुग्णांच्या ७२ टक्के म्हणजेच २४६९ एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

मृत्युदरावर नियंत्रण

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्युदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील मृत्युदर केवळ ०.७० टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ३६७ जणांचा बळी गेला असून, हा मृत्युदर २.२ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जवळपास एक टक्क्यांनी मृत्युदर घसरला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या