शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

धक्कादायक ! अकोला जिल्ह्यात पुनर्वसित आठ गावातील २२८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 18:03 IST

चिखलदरा, दि. 19 -  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांत सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असताना प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. २२८ जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासी संतापले असून बुधवारी त्यांनी पुन्हा मेळघाटात परत जाण्याचा निश्चय केला आहे. चिखलदरा तालुक्यातील केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा ...

चिखलदरा, दि. 19 -  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांत सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असताना प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. २२८ जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासी संतापले असून बुधवारी त्यांनी पुन्हा मेळघाटात परत जाण्याचा निश्चय केला आहे. चिखलदरा तालुक्यातील केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोना, धारगड या सहा गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, तर नगरतास व बारुखेडा या दोन गावांचे तेल्हारा तालुक्यात सन २०११ ते २०१५ यादरम्यान टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वसलेल्या एकूण १४ गावांचे पुनर्वसन शासनाने केले असले तरी या आठ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांअभावी त्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणात राहणा-या आदिवासींना जंगलाबाहेर काढताच त्यांना विविध आजाराने ग्रासले. पैशाची चणचण, पुनर्वसित गावांत कुठल्याच आरोग्य सुविधा नसल्याने आबालवृद्ध अशा २२८ जणांचा चार वर्षांत तडफडून मृत्यू झाल्याचे सत्य बाहेर आले आहे. मृतांमध्ये युवकांची संख्या अधिकगत चार वर्षांत मृतांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार अमोना येथे नऊ मृत्यूपैकी दोन युवक, गुल्लरघाट १२ मृत्यूमध्ये सहा युवक, धारगड ४२ मृत्यूपैकी २० युवक, सोमठाणा खुर्द १० पैकी तीन युवक, केलापाणी १२ पैकी नऊ युवक, नगरतास १३ पैकी ९ युवक, बारूखेडा ६६ पैकी २५ युवक, सोमठाणा ६४ पैकी ३० युवक असे एकूण आठ गावांत २२८ मृत्यूसंख्येत ३० ते ३५ वयोगटातील १०४ युवकांचा समावेश आहे. एकाच घरातील सहा मृत्यूबारूखेडा येथील रामकली, बुडा बेठेकर या साठीतील म्हातारीने अगोदर अश्रूला वाट मोकळी केली आणि पुनर्वसनानंतर अधिका-यांची इंग्रजाप्रमाणे वागणुकीचा पाढा वाचत पाच वर्षांत पती, दोन मुलं आणि तीन नातवंड अशा सहा जणांचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचे सांगितले. सोमठाणा बु. येथील एकाच वेळी घरातील चौघांना पुनर्वसनाचे पैसे न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागले. रतीराम गंगाराम जावरकर (४२) यांना आजारी असल्याने अकोला येथे उपचारासाठी नेले. त्यांचा भाऊ राजकुमार व्याघ्र अधिकाºयांकडे पुनर्वसनाचा बाँड तोडून पैसे मागायला गेला. त्याला हाकलून लावले. परिणामी रतिरामने मृत्यूला कवटाळले. त्याचा धसका घेत राजकुमार, रतिरामची पत्नी रखमा जावरकर व आई गंगा जावरकर अशा चौघांचा मृत्यू झाला.  पुनर्वसित आठ गावांतील आदिवासींसोबत केलपाणी येथे बुधवारी बैठक झाली. त्यांच्या अनेक समस्या ऐकून घेतल्या. प्रशासनाला दोन महिन्यांचा वेळ देऊ, अन्यथा आपला मेळघाटातील हिसका दाखवू.- राजकुमार पटेल, माजी आमदारआठ गावांतील आम्हा आदिवासींची फसवणूक करून पुनर्वसन केले. २२८ जणांचा मृत्यू झाला. पण उपचार दिले नाहीत. आरोग्य केंद्र नाही. कुठल्याच सुविधा नाही. त्यामुळे आम्ही आता पुन्हा मेळघाटात जाण्याचा संकल्प केला. - विष्णू राऊत, गुल्लरघाट