शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रूमणे मोर्चा

By admin | Updated: May 2, 2017 01:21 IST

५ मे रोजी बाळापूर तालुक्यातून मोर्चाला सुरुवात: शिवसेनेची पत्रकार परिषदेत माहिती

अकोला: जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणे तर सोडाच त्यांच्या तुरीची खरेदी करण्यास जाणीवपूर्वक आखडता हात घेऊन शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलणाऱ्या भाजपला झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘रुमणे’ मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून, याची सुरुवात ५ मे रोजी बाळापूर तालुक्यातून केली जात असल्याची माहिती जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता; परंतु ज्या पद्धतीने भाजप सरकारने तूर खरेदी करताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जाचा डोंगर वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही सरकारमध्ये भाजपच्या सोबत असलो तरी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा निघत नसेल तर आमचा सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. तूर खरेदीवरून भाजपने वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या पाहता एकप्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात आल्याचे दिसून येते. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, भाजपला झोपेतून जागे करण्यासाठी येत्या ५ मे रोजी बाळापूर तालुक्यात ऐतिहासिक अशा ‘रुमणे’मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख देशमुख यांनी दिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अकोट, मूर्तिजापूर व अकोला तालुक्यात मोर्चा काढला जाईल. मोर्चामध्ये सामील शेतकऱ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत संबोधित करणार आहेत. पत्रकार परिषदेला आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, संतोष अनासने, तरुण बगेरे, प्रदीप गुरुखुद्दे, अश्विन नवले, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, दिनेश सरोदे, अश्विन पांडे,धनंजय गावंडे उपस्थित होते.शेतकरी अडचणीत; भाजपची चुप्पीअर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहाचे कामकाज २० दिवस बंद पाडल्याची आठवण करून देत आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्लाबोल केला. निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक उत्पादन वाढले असले तरी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे आ. बाजोरिया यांनी सांगितले. नाफेडने तूर खरेदीची नौटंकी केली. खरा लाभ व्यापाऱ्यांना मिळाला. शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त असून, त्यांची व्यथा समजून घेण्याची गरज आहे. शिवसेना शेतकऱ्यांप्रती बांधील असून, जोपर्यंत त्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत भाजप सरकारच्या धोरणांना आमचा विरोध कायम राहणार असल्याचे आ. बाजोरिया यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या मोर्चात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.