शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना-भाजप समान

By admin | Updated: February 4, 2017 02:23 IST

दोन्ही पक्षांचे ७३-७३ उमेदवार आमने-सामने

अकोला, दि. 0४- आजपर्यंंंत एकमेकांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाणार्‍या शिवसेना, भाजपची महापालिकेसाठी युती तुटताच राजकीय समीकरणांमध्ये घडामोडी सुरू झाल्या. केंद्र व राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप मोठय़ा भूमिकेत वावरू लागला. अशा स्थितीत महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेने ७३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर योगायोगाने भाजपनेदेखील ७३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत नेमक ा कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे सर्वांंंचेच लक्ष लागले आहे. राज्यात पार पडलेल्या २0१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे बिनसले, ते अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्ष सत्तेची फळं चाखत असतानाच शिवसेनेकडून मित्र पक्षावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजपकडूनदेखील सेनेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील ही खदखद नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत समोर आली.निवडणूक रिंगणातील इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्यानंतर युतीच्या निर्णयावर चर्चा झडू लागल्या. शेवटी नगरपालिका निवडणुकीत युती न करताच दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. ही परिस्थिती राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहील का,असा कयास बांधला जात असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून यापुढे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे संकेत दिले. युती तुटल्याचा सर्वाधिक आनंद दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंनाच अधिक झाल्याचे दिसून आले. निवडणुकीतून उमेदवारीचा पत्ता कट होईल, या धास्तीने युती तुटल्याचे समाधान व्यक्त होऊ लागले. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी वाटचाल सुरू केली. मनपाच्या ८0 जागांसाठी सेना-भाजपने प्रत्येकी ७३-७३ उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी दोन्ही पक्ष किती जागांवर विजयी होतात, हे मतदार राजावर अवलंबून आहे, हे तेवढेच खरे. आक्रमक होण्याचे निर्देशमहापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आक्रमक बाणा जोपासण्याचा कानमंत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर लढत असल्यामुळे पक्षाची ताकद सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असण्याच्या मुद्यावर सेनेत रणनिती आखल्या जात आहे.