शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना-भाजप समान

By admin | Updated: February 4, 2017 02:23 IST

दोन्ही पक्षांचे ७३-७३ उमेदवार आमने-सामने

अकोला, दि. 0४- आजपर्यंंंत एकमेकांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाणार्‍या शिवसेना, भाजपची महापालिकेसाठी युती तुटताच राजकीय समीकरणांमध्ये घडामोडी सुरू झाल्या. केंद्र व राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप मोठय़ा भूमिकेत वावरू लागला. अशा स्थितीत महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेने ७३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर योगायोगाने भाजपनेदेखील ७३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत नेमक ा कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे सर्वांंंचेच लक्ष लागले आहे. राज्यात पार पडलेल्या २0१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे बिनसले, ते अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्ष सत्तेची फळं चाखत असतानाच शिवसेनेकडून मित्र पक्षावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजपकडूनदेखील सेनेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील ही खदखद नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत समोर आली.निवडणूक रिंगणातील इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्यानंतर युतीच्या निर्णयावर चर्चा झडू लागल्या. शेवटी नगरपालिका निवडणुकीत युती न करताच दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. ही परिस्थिती राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहील का,असा कयास बांधला जात असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून यापुढे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे संकेत दिले. युती तुटल्याचा सर्वाधिक आनंद दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंनाच अधिक झाल्याचे दिसून आले. निवडणुकीतून उमेदवारीचा पत्ता कट होईल, या धास्तीने युती तुटल्याचे समाधान व्यक्त होऊ लागले. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी वाटचाल सुरू केली. मनपाच्या ८0 जागांसाठी सेना-भाजपने प्रत्येकी ७३-७३ उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी दोन्ही पक्ष किती जागांवर विजयी होतात, हे मतदार राजावर अवलंबून आहे, हे तेवढेच खरे. आक्रमक होण्याचे निर्देशमहापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आक्रमक बाणा जोपासण्याचा कानमंत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर लढत असल्यामुळे पक्षाची ताकद सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असण्याच्या मुद्यावर सेनेत रणनिती आखल्या जात आहे.