शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना-भाजप समान

By admin | Updated: February 4, 2017 02:23 IST

दोन्ही पक्षांचे ७३-७३ उमेदवार आमने-सामने

अकोला, दि. 0४- आजपर्यंंंत एकमेकांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाणार्‍या शिवसेना, भाजपची महापालिकेसाठी युती तुटताच राजकीय समीकरणांमध्ये घडामोडी सुरू झाल्या. केंद्र व राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप मोठय़ा भूमिकेत वावरू लागला. अशा स्थितीत महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेने ७३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर योगायोगाने भाजपनेदेखील ७३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत नेमक ा कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे सर्वांंंचेच लक्ष लागले आहे. राज्यात पार पडलेल्या २0१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे बिनसले, ते अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्ष सत्तेची फळं चाखत असतानाच शिवसेनेकडून मित्र पक्षावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजपकडूनदेखील सेनेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील ही खदखद नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत समोर आली.निवडणूक रिंगणातील इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्यानंतर युतीच्या निर्णयावर चर्चा झडू लागल्या. शेवटी नगरपालिका निवडणुकीत युती न करताच दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. ही परिस्थिती राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहील का,असा कयास बांधला जात असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून यापुढे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे संकेत दिले. युती तुटल्याचा सर्वाधिक आनंद दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंनाच अधिक झाल्याचे दिसून आले. निवडणुकीतून उमेदवारीचा पत्ता कट होईल, या धास्तीने युती तुटल्याचे समाधान व्यक्त होऊ लागले. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी वाटचाल सुरू केली. मनपाच्या ८0 जागांसाठी सेना-भाजपने प्रत्येकी ७३-७३ उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी दोन्ही पक्ष किती जागांवर विजयी होतात, हे मतदार राजावर अवलंबून आहे, हे तेवढेच खरे. आक्रमक होण्याचे निर्देशमहापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आक्रमक बाणा जोपासण्याचा कानमंत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर लढत असल्यामुळे पक्षाची ताकद सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असण्याच्या मुद्यावर सेनेत रणनिती आखल्या जात आहे.