शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अकोल्यातील गृहरक्षक दलाच्या क्रीडांगणाजवळ युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:39 IST

हॉटेलमधील काम आटोपून घरी परत जाणार्‍या दोघांपैकी एकावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा रामदास पेठ येथे घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देहॉटेलमधील काम आटोपून घरी परत जात असताना झाला हल्लाया प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हॉटेलमधील काम आटोपून घरी परत जाणार्‍या दोघांपैकी एकावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा रामदास पेठ येथे घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल बाळकृष्ण बोरसे (२३, रा. जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ, स्वराज पेठ) हे त्यांचे मित्र अनिल गजानन अवमन यांच्यासोबत हॉटेलमधील काम पूर्ण करून घरी परत जात होते. गृहरक्षक दलाच्या क्रीडांगणाजवळ त्यांच्या मागून दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी श्रीकांत काळे यास ओळखतो काय, असे विचारले. त्यांनी नाही म्हटल्यावर अनिल बोरसे यांना या तिघांनी मारण्यास सुरुवात केली. परंतु, ते दोघेही तिथून पळून जवळच असलेल्या रुग्णालयाच्या आत जीव वाचविण्यासाठी शिरले. परंतु, ते तिघे रुग्णालयाच्या आत आले आणि अनिल बोरसे यांना धारदार शस्त्राने मारण्यास सुरुवात केली. त्यांनी आरडाओरड केली असता ते तिघेही पळून गेले. त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहर