शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

सोयाबीन सातहजारीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

अकोला : खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. तरी अद्यापही बाजार समितीत थोड्याफार प्रमाणात सोयाबीनची आवक ...

अकोला : खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. तरी अद्यापही बाजार समितीत थोड्याफार प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू आहे. शनिवारी सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ!

अकोला : कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारपासून सायंकाळी ४ नंतर बहुतांश व्यवसायांना बंदी आहे.

प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी

अकोला : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात बाजारपेठ खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमाच्या अधीन राहून सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी हाेत आहे.

बैलजाेडी खरेदी करायची कशी?

अकोला : खरीप हंगाम सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना बैलजाेडीची नितांत आवश्यकता असते. काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने गुुरांच्या बाजारावर घातलेली बंदी अद्याप उठवली नाही. त्यामुळे बैलजाेडीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना सामाेरे जावे लागत असून, गरजू शेतकऱ्यांवर बैलजाेडी विक्रेत्या शेतकऱ्यांच्या शाेधात गावाेगाव भटकण्याची वेळ ओढवली आहे.

साेयाबीन बियाणांसाठी भटकंती

अकोला : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली; परंतु अद्यापही पेरणी पूर्ण झाली नाही. बाजारात साेयाबीन बियाणांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाणांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

ऑटो चालकांचे मास्क हनुवटीवर

अकोला : कोरोनाचा संसर्ग कायम असतानादेखील काही ऑटोचालक नाका-तोंडाऐवजी मास्क हनुवटीवर ठेवत आहेत. याशिवाय काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांची कारवाई व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

‘एक गाव, एक वाण’ माेहीम यशस्वी करा!

अकोला : ‘एक गाव, एक वाण’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात हरभरा पिकासाठी गावे निवडण्यात आली आहेत. उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.

ग्रामीण भागात बसची प्रतीक्षाच!

अकोला : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही बसची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.