शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

‘भरोसा सेल’कडे तब्बल सातशेवर तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:21 IST

४९८ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न करता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद घेऊन त्याचा निपटारा करण्यात आला आहे.

अकोला: महिला, मुली व वयोवृद्धांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या भरोसा सेलचा विश्वास नऊ महिन्यांतच वाढल्याचे त्यांच्याकडे नऊ महिन्यांत झालेल्या तक्रारींच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सेलकडे सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ७७० च्यावर तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामधून सुमारे ३०० वर तक्रारींचा निपटारा करण्यात सेलला यश आले आहे.अकोल्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ७७० तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या असून, यामध्ये १६२ तक्रारींवर कायदेशीर कारवाई करताना तडजोड झालेली नाही. २५२ प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांनी स्वत:हून तक्रार मागे घेत तसेच त्यांचे समुपदेशन करून या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ४९८ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न करता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद घेऊन त्याचा निपटारा करण्यात आला आहे. १७ प्रकरणे जिल्ह्याच्या बाहेरील असून, त्यांच्या पत्नीचे माहेर असलेल्या जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचे १६९ प्रकरणांमध्ये कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २३० प्रकरणांमध्ये भरोसा सेलने समेट घडवून आणला असून, यासाठी भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक संजीव राऊत यांनी प्रयत्न केले आहेत. व्यसनाधीनता, फसवणूक, लग्नाच्या आधी खोटी माहिती देणे, अपेक्षाभंग, संशय, विवाहबाह्य संबंध अशा विविध कारणांच्या तक्रारी भरोसा या महिला तक्रार निवारण केंद्रांमध्ये दाखल झाल्या होत्या. जिल्ह्यातील महिलांना प्रथम समुपदेशन करून कायदेशीर सल्ला दिला जातो. यामध्ये विधी अधिकारी, संरक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचे सहकार्य घेऊन प्रकरण आपसात करण्याचा प्रयत्न हा सेल करीत आहेत. मोबाइल प्रचंड घातकमोबाइलवरील सोशल मीडियाचे थेट दुष्परिणाम कौटुंबिक कलहामध्ये दिसायला लागले आहेत. वास्तव जीवनापेक्षा केवळ स्वप्नातील आयुष्याचा पाठलाग काही मुली करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त आहेत. मोबाइलचा अट्टहास अनेक संसारांमध्ये दरी निर्माण करीत असल्याचेही भरोसा सेलकडे झालेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. मोबाइलचा अतिरेक तसेच संशय, विवाहबाह्य संबंधाची खात्री न करता केवळ सांगण्यावरून संशय घेत असल्यानेही संसार मोडल्याचे वास्तव आहे. यासारख्या अनेक तक्रारी येतात; परंतु गुन्हे दाखल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत पती-पत्नी यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.- संजीव राऊत, पोलीस निरीक्षक,भरोसा सेल, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस