शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सुनील धोपेकर हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाने केली होती आरोपींची निर्दोष सुटका जयराज बारमध्ये दारू व जेवणाचे पैसे देण्यावरून झाला होता राडा ...

जिल्हा व सत्र न्यायालयाने केली होती आरोपींची निर्दोष सुटका

जयराज बारमध्ये दारू व जेवणाचे पैसे देण्यावरून झाला होता राडा

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवरील जयराज वाईन बारमध्ये सात ते आठ जणांनी यथेच्छ मद्यप्राशन व जेवण केल्यानंतर बिलाचे चार हजार रुपये न देता बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांच्याशी वाद घालून त्यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांड प्रकरणात ८ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यामधील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली. या हत्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने आठही आरोपींना निर्दोष सोडले होते.

पातूर रोडवरील जयराज वाईन बार येथे विवेक प्रकाश इंगळे (३३), सतीश गुलाब खंडारे (३४), सागर रामराव उपरवाट (२९), नीतेश गुलाब खंडारे (३०), कुणाल शिवचरण तायडे (३२), अक्षय मोहन घुगे (३७) व शुभम शेषराव खंडारे (३२) या आरोपींनी १३ ऑगस्ट २०१४ रोजी यथेच्छ मद्यप्राशन करून जेवण केले. त्यानंतर बिलाचे पैसे देण्यावरून वाद झाला असता आरोपींनी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (४६) याला तिथे बोलावले. त्यामुळे वाद आणखी वाढला. मात्र तरीही वेटरने चार हजार रुपयांचे बिल या आरोपींना देऊन पैशाची मागणी केली असता आरोपींनी बिल न देता वेटर व वाईन बारमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू केला. यावेळी वाईन बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करून बिलाची मागणी केली. मात्र नशेत असलेल्या आरोपींनी सुनील धोपेकर यांच्यावर लोखंडी पाईप व काठीने हल्ला चढविला. यामध्ये सुनील धोपेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३२६ तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती; मात्र या निर्णयाविरोधात सरकार पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गजानन काशिनाथ कांबळे वगळता इतर सात आरोपींना सुनील धोपेकर यांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

--------------------

२०१८ मध्ये सुटले होते निर्दोष

सुनील धोपेकर हत्याकांडातील आरोपी ५ मार्च २०१८ रोजी सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याचे कारणावरून सर्वांना निर्दोष सोडले होते. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा सुधारित निर्णय दिला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

--------------------

अशी घडली घटना

१२ ऑगस्ट २०१४ रोजी आरोपी सतीश खंडारे, उपरवाट व इतर चार जणांनी जयराज बारमध्ये ४ हजार रुपयांची दारू व खाद्य पदार्थ खरेदी केले. त्यानंतर आरोपींनी लगेच बिल देण्यास नकार दिला. रक्कम उधार ठेवण्यास सांगितले. त्यावरून मयत सुनील धाेपेकर व इतर बार कर्मचाऱ्यांचा आरोपींसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपीनी धोपेकर यांना पाहून घेण्याची धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी आरोपींनी सुनील धाेपेकर यांना लोखंडी पाईप व काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोपींना एकूण ५ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम मयताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले. त्यामुळे सुनील धोपेकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत होणार आहे.