शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यात केवळ १४ टक्केच शाळांचे स्वयंमूल्यमापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:47 IST

अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे. मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्याप ८६ टक्के म्हणजेच राज्यातील ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेले नाही.शाळासिद्धी कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व शाळांची माहिती भरून शाळा स्वयंमूल्यमापन करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. १00 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन जानेवारी २0१९ अखेर पूर्ण करण्यास सांगितले होते. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागानेसुद्धा शाळांना सूचना दिल्या होत्या; परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील १ लाख ९ हजार ११0 शाळांपैकी केवळ १५ हजार ६७१ शाळांनीच स्वयंमूल्यमापन केले आहे. अद्याप ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ९.१३ टक्के, अमरावती जिल्ह्यात ५.५४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १0.३४ टक्के, वाशिम-१९.१६ टक्के, यवतमाळ-८.४७ टक्केच शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. स्वयंमूल्यमापन करण्यात शाळा उदासीनता दाखवित असल्यामुळे या शाळांसाठी पुन्हा मुदत वाढविण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा