शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

By संतोष येलकर | Updated: July 28, 2023 18:53 IST

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांकडून तक्रारींची तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधी पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. गेल्या ५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप पेरणी सुरु झाली. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. 

त्यामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधील कृषी विभागाकडे २६ जुलैपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या. त्यामध्ये काही ठिकाणी शेतात पेरलेले बियाणे पूर्णतः उगवले नाही तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे कमी प्रमाणात उगवले, अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा अहवाल पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला असून, बियाणे उगवले नसल्याच्या संबंधित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांद्वारे सुरु करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय शेतकऱ्यांकडूनप्राप्त तक्रारींची अशी आहे संख्या !तालुका             तक्रारी

  • पातूर             २५
  • बार्शिटाकळी            १५
  • अकोला             १४
  • मूर्तिजापूर             १२
  • बाळापूर             ०८
  • तेल्हारा             ०५
  • अकोट             ०३

 सोयाबीनच्या ८१ तर कपाशी बियाण्याची एक तक्रार  जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत सोयाबीन आणि कपाशी बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, कपाशीचे बियाणे उगवले नसल्याची एक तक्रार प्राप्त झाली आहे.

तालुकास्तरीय समित्या करणार तक्रारींचे निवारण पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवार समित्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेलापेरणीचा खर्च बुडालापेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसल्याने, पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून किती आणि कधी नुकसान भरपाई दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी