शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

By संतोष येलकर | Updated: July 28, 2023 18:53 IST

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांकडून तक्रारींची तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधी पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. गेल्या ५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप पेरणी सुरु झाली. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. 

त्यामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधील कृषी विभागाकडे २६ जुलैपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या. त्यामध्ये काही ठिकाणी शेतात पेरलेले बियाणे पूर्णतः उगवले नाही तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे कमी प्रमाणात उगवले, अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा अहवाल पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला असून, बियाणे उगवले नसल्याच्या संबंधित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांद्वारे सुरु करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय शेतकऱ्यांकडूनप्राप्त तक्रारींची अशी आहे संख्या !तालुका             तक्रारी

  • पातूर             २५
  • बार्शिटाकळी            १५
  • अकोला             १४
  • मूर्तिजापूर             १२
  • बाळापूर             ०८
  • तेल्हारा             ०५
  • अकोट             ०३

 सोयाबीनच्या ८१ तर कपाशी बियाण्याची एक तक्रार  जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत सोयाबीन आणि कपाशी बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, कपाशीचे बियाणे उगवले नसल्याची एक तक्रार प्राप्त झाली आहे.

तालुकास्तरीय समित्या करणार तक्रारींचे निवारण पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवार समित्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेलापेरणीचा खर्च बुडालापेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसल्याने, पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून किती आणि कधी नुकसान भरपाई दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी