शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 14:04 IST

शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला.

अकोला : जिल्ह्यात अनधिकृत बियाण्याच्या माध्यमातून बियाणे माफिया तयार होऊ देऊ नका, अनधिकृत बियाणे विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला.दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, वृक्ष लागवड, पीक कर्जाचे वाटप इत्यादी विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अकोला तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे व गटविकास अधिकारी राहुल शेळके उपस्थित होते. एचटीबीटी अनधिकृत बियाण्याचा वापर कुठे-कुठे सुरू आहे, अशी विचारणा करीत अनधिकृत बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होणार नाही, यासाठी गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. अकोला तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये टँकरच्या फेºया व्यवस्थित होतात की नाही, यासंदर्भात गावनिहाय माहिती घेतली. तसेच वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेले खड्डे आणि पीक कर्ज वाटपाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. या बैठकीला तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक व रोजगारसेवक उपस्थित होते.अनधिकृत सावकारी थांबविण्याचे निर्देश!दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे अनधिकृत सावकारी थांबवून, शेतकºयांना अधिकृत कर्ज मिळाले पाहिजे. कोणत्याही प्रकारची अवैध सावकारी होणार नाही, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.पाणंद रस्त्यांची पडताळणी करा!सात-बारावर असलेले आणि सात-बारावर नसलेले पाणंद रस्ते यासंदर्भात पडताळणी करून, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून, रोहयो अंतर्गत तालुक्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या. पाणंद रस्त्यांची कामे केल्यास गावातील वाद मिटतील, असेही त्यांनी सांगितले.मुख्यालयी राहणाºया कर्मचाºयांची माहिती शासनाकडे पाठवा!तालुक्यात किती कर्मचारी मुख्यालयी राहतात, अशी विचारणा करीत, यासंदर्भात माहिती एकत्रित करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद