शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 10:58 IST

पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे. तसेच ११० कोटींपैकी ८७ कोटीतून सर्व निकष-नियम धाब्यावर बसवित पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तांत्रिक सल्लागार एमजेपीने ‘डीपीआर’साठी ३ कोटी १४ लक्ष रुपयांचा भरणा करण्याचे पत्र मनपाला दिले आहे. मनपात भाजपची सत्ता ध्यानात घेता आघाडी सरकारकडून दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे दुरापास्त आहे. तसे झाल्यास जादा दराने निविदा मंजूर करीत मलिदा लाटणाºया काही राजकारण्यांसह अधिकाऱ्यांच्या दुकानदारीवर पाणी फेरल्या जाणार आहे.राज्यातील महापालिका, नगरपालिका तसेच नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी सन २०१९-२० करिता देण्यात आलेल्या निधीचा शासनाने लेखाजोखा घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, रस्ता अनुदान, हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे आदी विविध विकास कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर) दिले नसतील तर शासनाने संबंधित विकास कामांचा निधी इतरत्र वळता करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलल्या जात आहे. ‘अमृत’अभियानच्या पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम झटपट निकाली काढल्या जात आहे, तसेच पाणी पुरवठा योजनेचे कामही थातुरमातुर केल्या जात आहे. राज्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी देण्यासंदर्भात राज्य सरकारचे धोरण पाहता ‘अमृत’चा दुसरा टप्पा अधांतरी सापडण्याची दाट चिन्हं आहेत.

...तर ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नाही!अकोलेकरांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा होऊन डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती किंवा उद्योग व्यवसायाकरिता वापर करणे हा भूमिगत गटार योजनेचा उद्देश आहे. मोर्णा नदीच्या पात्रातून शिलोडा येथील एसटीपी (सीवरेज ट्रिटमेंट प्लान)पर्यंत मलवाहिनी टाकण्याचा समावेश हा दुसºया टप्प्यातील कामाचा भाग असताना केवळ खिसे गरम करण्याच्या उद्देशातून सदर कामाची सुरुवात पहिल्या टप्प्यात करण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या विसंगत धोरणामुळे ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नसल्याचे तूर्तास दिसत आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील कामांवर गडांतरहद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून ९६ कोटी २३ लक्ष निधी मंजूर असून, यामधून ५५२ विकास कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहेत. याबदल्यात कंत्राटदारांना आजवर ४० कोटींपेक्षा अधिक रकमेचे देयक अदा केले आहे. उर्वरित ८६ कामे अर्धवट स्थितीत आहेत. आघाडीचे सरकारचे धोरण पाहता उर्वरित निधीची शाश्वती नसल्यामुळे की काय,सत्तापक्ष भाजपने चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. एकूणच हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांवरही गंडांतर आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय