शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 10:58 IST

पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे. तसेच ११० कोटींपैकी ८७ कोटीतून सर्व निकष-नियम धाब्यावर बसवित पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तांत्रिक सल्लागार एमजेपीने ‘डीपीआर’साठी ३ कोटी १४ लक्ष रुपयांचा भरणा करण्याचे पत्र मनपाला दिले आहे. मनपात भाजपची सत्ता ध्यानात घेता आघाडी सरकारकडून दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे दुरापास्त आहे. तसे झाल्यास जादा दराने निविदा मंजूर करीत मलिदा लाटणाºया काही राजकारण्यांसह अधिकाऱ्यांच्या दुकानदारीवर पाणी फेरल्या जाणार आहे.राज्यातील महापालिका, नगरपालिका तसेच नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी सन २०१९-२० करिता देण्यात आलेल्या निधीचा शासनाने लेखाजोखा घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, रस्ता अनुदान, हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे आदी विविध विकास कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर) दिले नसतील तर शासनाने संबंधित विकास कामांचा निधी इतरत्र वळता करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलल्या जात आहे. ‘अमृत’अभियानच्या पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम झटपट निकाली काढल्या जात आहे, तसेच पाणी पुरवठा योजनेचे कामही थातुरमातुर केल्या जात आहे. राज्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी देण्यासंदर्भात राज्य सरकारचे धोरण पाहता ‘अमृत’चा दुसरा टप्पा अधांतरी सापडण्याची दाट चिन्हं आहेत.

...तर ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नाही!अकोलेकरांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा होऊन डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती किंवा उद्योग व्यवसायाकरिता वापर करणे हा भूमिगत गटार योजनेचा उद्देश आहे. मोर्णा नदीच्या पात्रातून शिलोडा येथील एसटीपी (सीवरेज ट्रिटमेंट प्लान)पर्यंत मलवाहिनी टाकण्याचा समावेश हा दुसºया टप्प्यातील कामाचा भाग असताना केवळ खिसे गरम करण्याच्या उद्देशातून सदर कामाची सुरुवात पहिल्या टप्प्यात करण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या विसंगत धोरणामुळे ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नसल्याचे तूर्तास दिसत आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील कामांवर गडांतरहद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून ९६ कोटी २३ लक्ष निधी मंजूर असून, यामधून ५५२ विकास कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहेत. याबदल्यात कंत्राटदारांना आजवर ४० कोटींपेक्षा अधिक रकमेचे देयक अदा केले आहे. उर्वरित ८६ कामे अर्धवट स्थितीत आहेत. आघाडीचे सरकारचे धोरण पाहता उर्वरित निधीची शाश्वती नसल्यामुळे की काय,सत्तापक्ष भाजपने चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. एकूणच हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांवरही गंडांतर आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय