शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

धान्य लाभासाठी पात्र लाभार्थींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:21 IST

अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली.

अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली. या अत्यल्प संख्येमुळे लाभार्थी वंचित असल्याने शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत काढलेल्या नव्या शिधापत्रिकांपैकी पात्र लाभार्थींची निवड करण्याची तयारी सुरू केली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार कुणीही भूकबळी जाऊ नये, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्न पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २०१३ मध्येच सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपासाठी लाभार्थी संख्या निश्चित केली. अत्यल्प उत्पन्न, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजारी रुग्ण या प्रकारातील कुटुंबांना अंत्योदय गटात लाभ देण्याचे ठरले. ग्रामीण भागात ४४ हजार रुपये तर शहरी भागात ५९ हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना प्राधान्य गटात धान्याचे लाभार्थी ठरविण्यात आले. या लाभार्थी गटांची राज्यभरातील पात्र संख्येनुसार जिल्हानिहाय संख्या निश्चित करण्यात आली. त्यासाठी ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष असलेल्या शिधापत्रिकांच्या संख्येतून कुटुंब व लाभार्थी संख्या ३ मार्च २०१७ रोजी शासनाने ठरवून दिली. लाभार्थी संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात धान्याचा लाभ देण्यासाठी ग्रामसभा, स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरून पात्र लाभार्थींची यादी तयार झाली. त्या यादीतूनही हजारो कुटुंबे धान्यापासून वंचित असल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत बदल करण्याची वेळ आली.

- जिल्ह्यातील हजारो कुटुंबे वंचित!अकोला जिल्ह्यासाठी शासनाने मार्च २०१७ मध्ये ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे नव्याने लाभार्थी निश्चित करताना जिल्ह्यातील लाभार्थींच्या हाती भोपळाच मिळाला आहे. केवळ अंत्योदय कुटुंबांना लाभ देण्यासाठी २०५ एवढीच संख्या निश्चित झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित असल्याने शासनाला पात्र शिधापत्रिकांसाठी मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंतच्या काढलेल्या शिधापत्रिकाधारकांचा विचार केला जाणार आहे.

- पात्र शिधापत्रिकांची संख्या अनभिज्ञमार्च २०१७ मध्ये अकोला शहरी भागात अंत्योदय-४५९२ कुटुंबे, प्राधान्य गट-३७०२०४ लाभार्थी पात्र होते. ग्रामीण भागात अंत्योदय ३९०२४ कुटुंबे, प्राधान्य गट- ६८६५१० लाभार्थी होते. नव्याने लाभ देण्यासाठी केवळ अंत्योदय गटात २०५ कुटुंबे निवडण्यात आली. आता नव्याने निवड होणाऱ्यांमध्ये किती शिधापत्रिकाधारकांचा समावेश होईल, ही बाब लवकरच पुढे येणार आहे.