शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

धान्य लाभासाठी पात्र लाभार्थींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:21 IST

अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली.

अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली. या अत्यल्प संख्येमुळे लाभार्थी वंचित असल्याने शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत काढलेल्या नव्या शिधापत्रिकांपैकी पात्र लाभार्थींची निवड करण्याची तयारी सुरू केली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार कुणीही भूकबळी जाऊ नये, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्न पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २०१३ मध्येच सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपासाठी लाभार्थी संख्या निश्चित केली. अत्यल्प उत्पन्न, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजारी रुग्ण या प्रकारातील कुटुंबांना अंत्योदय गटात लाभ देण्याचे ठरले. ग्रामीण भागात ४४ हजार रुपये तर शहरी भागात ५९ हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना प्राधान्य गटात धान्याचे लाभार्थी ठरविण्यात आले. या लाभार्थी गटांची राज्यभरातील पात्र संख्येनुसार जिल्हानिहाय संख्या निश्चित करण्यात आली. त्यासाठी ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष असलेल्या शिधापत्रिकांच्या संख्येतून कुटुंब व लाभार्थी संख्या ३ मार्च २०१७ रोजी शासनाने ठरवून दिली. लाभार्थी संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात धान्याचा लाभ देण्यासाठी ग्रामसभा, स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरून पात्र लाभार्थींची यादी तयार झाली. त्या यादीतूनही हजारो कुटुंबे धान्यापासून वंचित असल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत बदल करण्याची वेळ आली.

- जिल्ह्यातील हजारो कुटुंबे वंचित!अकोला जिल्ह्यासाठी शासनाने मार्च २०१७ मध्ये ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे नव्याने लाभार्थी निश्चित करताना जिल्ह्यातील लाभार्थींच्या हाती भोपळाच मिळाला आहे. केवळ अंत्योदय कुटुंबांना लाभ देण्यासाठी २०५ एवढीच संख्या निश्चित झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित असल्याने शासनाला पात्र शिधापत्रिकांसाठी मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंतच्या काढलेल्या शिधापत्रिकाधारकांचा विचार केला जाणार आहे.

- पात्र शिधापत्रिकांची संख्या अनभिज्ञमार्च २०१७ मध्ये अकोला शहरी भागात अंत्योदय-४५९२ कुटुंबे, प्राधान्य गट-३७०२०४ लाभार्थी पात्र होते. ग्रामीण भागात अंत्योदय ३९०२४ कुटुंबे, प्राधान्य गट- ६८६५१० लाभार्थी होते. नव्याने लाभ देण्यासाठी केवळ अंत्योदय गटात २०५ कुटुंबे निवडण्यात आली. आता नव्याने निवड होणाऱ्यांमध्ये किती शिधापत्रिकाधारकांचा समावेश होईल, ही बाब लवकरच पुढे येणार आहे.