शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आरटीई प्रवेशाचा फी परतावा शाळांना मिळेना

By atul.jaiswal | Updated: July 25, 2021 10:57 IST

Schools did not get refund of RTE admission fee : केंद्र सरकारकडून नियमितपणे मिळत असताना, गत चार वर्षांपासून राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा देण्यास दिरंगाई होत आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांचा फी परताव्याचा हिस्सा केंद्र सरकारकडून नियमितपणे मिळत असताना, गत चार वर्षांपासून राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा देण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे अनेक शाळांचे बजेट कोलमडले असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्क मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांचा फी परतावा सत्राच्या सुरुवातीला व नंतर डिसेंबरमध्ये अशा दोन टप्प्यांत शाळांना देण्याचा नियम आहे. त्यामधे केंद्र शासन ६० टक्के तर राज्य शासन ४० टक्के असा हिस्सा ठरलेला आहे.

याबाबत महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था संघटनेचे (मेस्टा) राज्य सदस्य राहुलदेव मनवर यांनी २४ जून रोजी केंद्र शासनाकडून अधिकारात माहिती मागविली आहे. त्यामधे राज्याला २०२१ पर्यंत वर्षातून २ वेळा निधी पाठविल्याचे केंद्र शासनाचे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अवर सचिव अनिल गेरोला यांनी मनवर यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी कार्यालयांना पुरेसा निधी न मिळाल्याने राज्यातील हजारो शाळांना २०१६ पासूनचा मोफत शिक्षण दिलेल्या २५ टक्के विद्यार्थ्यांचा फी परतावा मिळाला नसल्याचे मनवर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. काही शाळांना २०१९ पर्यंतचा फी परतावा मिळालेला असला तरी, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमधील आरटीई व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडूनही शुल्क मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शाळांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचा फी परतावा शासनाकडून मिळाल्यास शाळांना शिक्षणकार्य सुरळीत ठेवण्यास मोलाची मदत होऊ शकते.

 

थकबाकी २ हजार कोटींची, मागणी ८४६ कोटींची

राज्यातील शाळांचे २ हजार कोटी शासनाकडे थकलेले असताना शालेय शिक्षण संचालक यांनी संघटनेने निवेदन दिल्यानंतर १ जुलैला फक्त ६७७ कोटींची मागणी केली. त्यानंतर १४ जुलैला शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी फक्त १६९ कोटींचीच मागणी नियोजन विभागाकडे केल्याचे राहुलदेव मनवर यांनी म्हटले आहे.

 

इंग्रजी शाळांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. राज्य सरकारकडून मात्र या शाळांची उपेक्षा होत आहे. शासनाने थकबाकी बाकी असलेल्या शाळांचा फी परतावा तातडीने अदा करावा.

- राहुलदेव मनवर, राज्य सदस्य, मेस्टा संघटना, वाशिम

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा