शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

शाळांमध्ये साजरा होणार आपत्ती निवारण दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:38 IST

अकोला : नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवी जीव, वित्ताच्या बचावासाठी केल्या जाणार्‍या उपायांची रंगीत तालीम आता जिल्हय़ातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींमध्ये केल्या जाणार आहेत. त्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व धोके निवारण दिन साजरा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. यादरम्यान सप्ताह राबवून विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. 

ठळक मुद्देआपत्ती व धोक्यांबाबत रंगीत तालीम, उपक्रमआपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवी जीव, वित्ताच्या बचावासाठी केल्या जाणार्‍या उपायांची रंगीत तालीम आता जिल्हय़ातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींमध्ये केल्या जाणार आहेत. त्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व धोके निवारण दिन साजरा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. यादरम्यान सप्ताह राबवून विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत भूकंप, आग, पूर यासारख्या आपत्तींना जगभरातील मोठय़ा संख्येला सामोरे जावे लागत आहे. या आपत्तीमध्ये प्रचंड प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी होते. ती वाचवण्यासोबत त्यापासून बचाव करणे, आपत्तीच्या काळात मदतकार्य राबवण्याची गरज आहे; मात्र माहितीअभावी मदतकार्य राबवणेच अवघड होते, तर कधी-कधी मदतकार्य राबवणार्‍यांनाही आपत्तीचा फटका बसतो. त्यावर उपाय म्हणून आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना, बचावाच्या पद्धती याबाबतची माहिती, प्रशिक्षण देणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्य शासनाने ९ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आदेश देत उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले. आपत्ती व धोके निवारण दिवस राज्यात प्रथमच साजरा केला जात आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत आपत्ती व धोके निवारण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याशिवाय, जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्याचे कार्यक्रमही घेण्याचे सांगितले आहे. यादरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यास परीक्षेनंतरच्या काळात ते उपक्रम राबवण्यात येतील. 

आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणीपंचायतराज संस्थेंतर्गत सर्वच कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ मधील कलम ४0 नुसार सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, क्षमता बांधणी करणे, वार्षिक आढावा घेणे, याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक आपत्ती निवारण दिनसंयुक्त राष्ट्रसंघाने १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती व धोके निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. चालू वर्षापासून महाराष्ट्रातही हा दिवस साजरा करण्याचे शासनाने ठरवले. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्येही उपक्रमपंचायतराज संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या विविध कार्यालयांमध्येही आपत्ती निवारणाच्या रंगीत तालीमसोबत जागरूकता कार्यक्रम राबवण्याचे शासनाने बजावले आहे.