शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शालेय पोषण आहाराच्या धान्याचे मोजमापच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:06 IST

जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार अधीक्षकांचे कमालीचे दुर्लक्ष असून, पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराचे धान्य पुरवठादारांकडून मोजून घेतले जात नाही. त्याकडे जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार अधीक्षकांचे कमालीचे दुर्लक्ष असून, पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे, धान्यादी मालाचा दर्जा तपासण्याची कोणतीही सोय नसल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही अनेकदा झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील केंद्रशाळांची तपासणी करण्यासाठी पथकांना निर्देश दिले. त्या पथकांचा अहवाल तयार झाला आहे. त्यामध्ये शाळांमधील २२ बाबी असमाधानकारक असल्याचे पुढे आले आहे.त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे, माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य मोजून घेतले जात नसल्याचे पुढे आले. पुरवठादारांशी साटेलोटे असल्याने संबंधित मुख्याध्यापक त्याकडे कानाडोळा करतात. पोषण आहार अधीक्षकांनाही वाटा मिळत असल्याने नियमित भेटी न देता हा प्रकार सुरू ठेवण्यास मूक संमती दिली जात आहे. ही बाब खुद्द पथकांच्या निदर्शनास आली आहे. या साखळीचा पर्दाफाश केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यताही आहे. खिचडीचा नमुना तपासण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.पथकाच्या अहवालात इतर बाबींमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. इतिवृत्त बंद केले जात नाही. शाळांमध्ये भंगार पडून आहे. शिकस्त खोल्या पाडण्यासाठी उशीर केला जातो. त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. शौचालयांची दुरवस्था आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. शैक्षणिक साधनांचा प्रचंड अभाव आहे. शिष्यवृत्ती वर्गाचे नियोजन नाही. प्रथमोपचार पेटी अपूर्ण आहे. अनेक मुख्याध्यापकांना प्रशासन चालविता येत नाही. तसेच आर्थिक बाबींचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शाळेत व परिसरात इंग्रजी भाषेचा वापर होत नाही. खासगी शाळेतील शिक्षक केंद्रप्रमुखांचा आदेश, सूचनांचे पालन करीत नाहीत. केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात नाही. सरपंच, ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळत नाही. उर्दू शाळांचे कामकाज, परिसर स्वच्छता नियमित होत नाही. मुलांसाठी रात्र अभ्यासिका कोठेही सुरू नसल्याचेही पुढे आले आहे. हा एकत्रित अहवाल पथकांकडून तयार करण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे.खिचडीचा नमुना तपासण्याचीही सोय नाहीत्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे, माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य मोजून घेतले जात नसल्याचे पुढे आले. पुरवठादारांशी साटेलोटे असल्याने संबंधित मुख्याध्यापक त्याकडे कानाडोळा करतात. पोषण आहार अधीक्षकांनाही वाटा मिळत असल्याने नियमित भेटी न देता हा प्रकार सुरू ठेवण्यास मूक संमती दिली जात आहे. ही बाब खुद्द पथकांच्या निदर्शनास आली आहे. या साखळीचा पर्दाफाश केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यताही आहे. खिचडीचा नमुना तपासण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.

टॅग्स :Akolaअकोला