शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

शालेय पोषण आहाराच्या धान्याचे मोजमापच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:06 IST

जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार अधीक्षकांचे कमालीचे दुर्लक्ष असून, पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराचे धान्य पुरवठादारांकडून मोजून घेतले जात नाही. त्याकडे जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार अधीक्षकांचे कमालीचे दुर्लक्ष असून, पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे, धान्यादी मालाचा दर्जा तपासण्याची कोणतीही सोय नसल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही अनेकदा झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील केंद्रशाळांची तपासणी करण्यासाठी पथकांना निर्देश दिले. त्या पथकांचा अहवाल तयार झाला आहे. त्यामध्ये शाळांमधील २२ बाबी असमाधानकारक असल्याचे पुढे आले आहे.त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे, माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य मोजून घेतले जात नसल्याचे पुढे आले. पुरवठादारांशी साटेलोटे असल्याने संबंधित मुख्याध्यापक त्याकडे कानाडोळा करतात. पोषण आहार अधीक्षकांनाही वाटा मिळत असल्याने नियमित भेटी न देता हा प्रकार सुरू ठेवण्यास मूक संमती दिली जात आहे. ही बाब खुद्द पथकांच्या निदर्शनास आली आहे. या साखळीचा पर्दाफाश केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यताही आहे. खिचडीचा नमुना तपासण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.पथकाच्या अहवालात इतर बाबींमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. इतिवृत्त बंद केले जात नाही. शाळांमध्ये भंगार पडून आहे. शिकस्त खोल्या पाडण्यासाठी उशीर केला जातो. त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. शौचालयांची दुरवस्था आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. शैक्षणिक साधनांचा प्रचंड अभाव आहे. शिष्यवृत्ती वर्गाचे नियोजन नाही. प्रथमोपचार पेटी अपूर्ण आहे. अनेक मुख्याध्यापकांना प्रशासन चालविता येत नाही. तसेच आर्थिक बाबींचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शाळेत व परिसरात इंग्रजी भाषेचा वापर होत नाही. खासगी शाळेतील शिक्षक केंद्रप्रमुखांचा आदेश, सूचनांचे पालन करीत नाहीत. केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात नाही. सरपंच, ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळत नाही. उर्दू शाळांचे कामकाज, परिसर स्वच्छता नियमित होत नाही. मुलांसाठी रात्र अभ्यासिका कोठेही सुरू नसल्याचेही पुढे आले आहे. हा एकत्रित अहवाल पथकांकडून तयार करण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे.खिचडीचा नमुना तपासण्याचीही सोय नाहीत्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे, माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य मोजून घेतले जात नसल्याचे पुढे आले. पुरवठादारांशी साटेलोटे असल्याने संबंधित मुख्याध्यापक त्याकडे कानाडोळा करतात. पोषण आहार अधीक्षकांनाही वाटा मिळत असल्याने नियमित भेटी न देता हा प्रकार सुरू ठेवण्यास मूक संमती दिली जात आहे. ही बाब खुद्द पथकांच्या निदर्शनास आली आहे. या साखळीचा पर्दाफाश केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यताही आहे. खिचडीचा नमुना तपासण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.

टॅग्स :Akolaअकोला