शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

अकाेला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक ...

अकाेला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ एप्रिलऐवजी २३ मे रोजी होणार असून विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविल्यानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २५ एप्रिल रोजी होणार होती; मात्र शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २५ एप्रिलदरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अभ्यासाकरिता आता आणखी काही दिवस मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. ती आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

असा करावा अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाइटवर करावा. वेळापत्रक, माहिती पुस्तिका आणि अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे.

दहावी, बारावी परीक्षा व कोरोनाचे कारण

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे हा परीक्षेसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे.

२५ एप्रिल रोजी नियोजित शिष्यवृत्ती परीक्षेकरिता बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्जच सादर झाले नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत.

२३ मे रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाइन, असा प्रश्न शाळांचे मुख्याध्यापक व पालकांसमोर उपस्थित झाला आहे.