शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

ऐन रब्बीच्या तोंडावर खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी, अकोला जिल्ह्यासाठी ७१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

By रवी दामोदर | Updated: September 27, 2022 14:05 IST

Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

- रवी दामोदर अकोला : खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्याची तब्बल ७१ हजार मेट्रिक टनाची मागणी असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२ हजार मेट्रिक टनच खत उपलब्ध आहे. त्यामळे आगामी दिवसांत शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये डीएपी मिळत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांमधून होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना डीएपीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला. आता ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२५१ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कृषी सेवा केंद्र चालक डीएपीचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ३१० मेट्रिक टन मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी ८५ हजार ९०५ मेट्रिक टन प्राप्त झाला आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ करिता कृषी विभागाकडून ७१ हजार मेट्रिक टन मागणी असून, जिल्ह्यात केवळ १० हजार ते १२ हजार मेट्रिक टनच खतं उपलब्ध आहे. त्यापैकी डीएपी खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

 हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार !जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढणार आहे. बहुतांश भाग खारपाणपट्टा असल्याने शेतकरी दरवर्षी हरभऱ्याला पसंती देतात. पश्चिम विदर्भातील अकोल्यासह, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी पेरणीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. मात्र, खत टंचाई असल्याने शेतकऱ्यांची ऐनवेळी धावाधाव होणार आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती