शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऐन रब्बीच्या तोंडावर खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी, अकोला जिल्ह्यासाठी ७१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

By रवी दामोदर | Updated: September 27, 2022 14:05 IST

Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

- रवी दामोदर अकोला : खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्याची तब्बल ७१ हजार मेट्रिक टनाची मागणी असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२ हजार मेट्रिक टनच खत उपलब्ध आहे. त्यामळे आगामी दिवसांत शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये डीएपी मिळत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांमधून होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना डीएपीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला. आता ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२५१ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कृषी सेवा केंद्र चालक डीएपीचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ३१० मेट्रिक टन मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी ८५ हजार ९०५ मेट्रिक टन प्राप्त झाला आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ करिता कृषी विभागाकडून ७१ हजार मेट्रिक टन मागणी असून, जिल्ह्यात केवळ १० हजार ते १२ हजार मेट्रिक टनच खतं उपलब्ध आहे. त्यापैकी डीएपी खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

 हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार !जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढणार आहे. बहुतांश भाग खारपाणपट्टा असल्याने शेतकरी दरवर्षी हरभऱ्याला पसंती देतात. पश्चिम विदर्भातील अकोल्यासह, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी पेरणीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. मात्र, खत टंचाई असल्याने शेतकऱ्यांची ऐनवेळी धावाधाव होणार आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती