शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आत्मक्लेश सत्याग्रहाला समाजसेवकांचे आर्थिक बळ!

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

जामदरा येथे मान्यवरांच्या भेटी; शेतक-यांचा खरीप हंगामावर बहिष्कार.

वाशिम: जामदरा (कवठळ) येथील शेतकर्‍यांनी यावर्षीच्या खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. त्यांनी शासनाकडे कोणतीही मदत न करता मजुरी करून पोट भरण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारचा आत्मक्लेश सत्याग्रहच असून, गाववासियांना समाजसेवकांनी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळामुळे जामदरा कवठळ येथील शेतकर्‍यांनी यावर्षी खरीप हंगामात पेरणी न करता शेत पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाकडे कोणतीही मागणी न करता त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एकप्रकारे शासनाच्या विरोधातील आत्मक्लेश सत्याग्रहच आहे. जामदरा येथील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव फाले, यवतमाळ जिल्हय़ातील नेर येथील निकेश जैत यांनी मंगळवारी जामदरा येथे जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील हंगामात काय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावकर्‍यांना त्यांनी आर्थिक सहाय्यही केले. कृषी विभागाने या गावात जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची हमी दिली. जामदरावासियांच्या आंदोलनाला आता आर्थिक सहाय्य मिळण्याचा ओघ सुरू झाला आहे.