शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आत्मक्लेश सत्याग्रहाला समाजसेवकांचे आर्थिक बळ!

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

जामदरा येथे मान्यवरांच्या भेटी; शेतक-यांचा खरीप हंगामावर बहिष्कार.

वाशिम: जामदरा (कवठळ) येथील शेतकर्‍यांनी यावर्षीच्या खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. त्यांनी शासनाकडे कोणतीही मदत न करता मजुरी करून पोट भरण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारचा आत्मक्लेश सत्याग्रहच असून, गाववासियांना समाजसेवकांनी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळामुळे जामदरा कवठळ येथील शेतकर्‍यांनी यावर्षी खरीप हंगामात पेरणी न करता शेत पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाकडे कोणतीही मागणी न करता त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एकप्रकारे शासनाच्या विरोधातील आत्मक्लेश सत्याग्रहच आहे. जामदरा येथील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव फाले, यवतमाळ जिल्हय़ातील नेर येथील निकेश जैत यांनी मंगळवारी जामदरा येथे जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील हंगामात काय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावकर्‍यांना त्यांनी आर्थिक सहाय्यही केले. कृषी विभागाने या गावात जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची हमी दिली. जामदरावासियांच्या आंदोलनाला आता आर्थिक सहाय्य मिळण्याचा ओघ सुरू झाला आहे.