शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रशासनाच्या प्रयत्नांवर समाधान; पण सुपरस्पेशालिटीसाठी हवे होते! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 09:52 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदमान्यता दिली असती तर कोरोनाच्या लढाईत मोलाची भर पडली असती, असा टोलाही राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सरकारला हाणला.

अकोला : संपूर्ण विदर्भात अकोला हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. सर्वाधिक मृत्यू व सर्वाधिक रुग्ण अकोल्यात आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या विरोधात येथील प्रशासन व आरोग्य यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी आपल्या परिने प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात प्रशासनाच्या प्रयत्नांवर समाधान व्यक्त करतानाच राज्य सरकारने येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदमान्यता दिली असती तर कोरोनाच्या लढाईत मोलाची भर पडली असती, असा टोलाही राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सरकारला हाणला.देवेंद्र फडणविस हे सोमवारी अकोला दौºयावर होते. या दौºयात त्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारलेल्या कोविड सेंटर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अकोल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. येथील रग्णवाढीचा वेग हा १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येणाºया काळात टेस्ट वाढविणे गरजेचे असून, मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले. कोविड सेंटर, तसेच विलगीकरण कक्षाला भेट दिल्यानंतर तेथील रुग्णांनी व्यवस्थेबाबत तसेच सर्वोपचारमधील रुग्णांनीही उपचाराबाबत समाधान व्यक्त केले, ही चांगली बाब आहे. प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करत असल्याचे हे द्योतक आहे; मात्र दुसरीकडे राज्यशासन या यंत्रणांना सक्षम मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना संकटात महानगरपालिकासारख्या संस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असताना या संस्थांना सरकारने अनुदान दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजप सरकारच्या काळात अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले; मात्र या सरकारने रुग्णालयासाठी पदमान्यताच न दिल्याने ही इमारत शोभेची ठरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व मुख्य सचिवांशी लवकरच चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

कर्जमाफी नाही अन् हमीनंतर कर्जही नाहीराज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकºयांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकºयांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या