शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पाण्याचे सूक्ष्म व्यवस्थापनच भविष्यात तारणार- संजय बेलसरे

By admin | Updated: September 25, 2015 01:04 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा.

अकोला: जगात सर्वाधिक पाण्याचा साठा आपल्याकडे आहे; परंतु या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पाणीसाठय़ाचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासोबतच पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपसचिव डॉ. संजय बेलसरे यांनी गुरुवारी येथे केले. अकोला अभियंता व वास्तुविद् संघटना आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलाजी अकोलाच्यावतीने गुरुवार, २४ सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बेलसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, संजीव जैन, काशीनाथ खडसे, व्ही.एस. जामोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बेलसरे यांनी या प्रसंगी एका चित्रफितीद्वारे जगातील पाण्याची उपलब्धता आणि नियोजन, या माहितीसह आपल्याकडे वापर होत असलेल्या पाण्याची तुलनात्मक माहिती दिली. अँड. शेळके यांनी अभियांत्रिकी क्षेत्राला अवकळा आली असल्याची वास्तविकता मांडताना, अभियांत्रिकीला चांगले दिवस आणण्याची जबाबदारी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या प्रत्येक अभियंत्याची असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. अभियांत्रिकीला पारंपरिक इतिहास आहे. अभियंत्यांनीच देश सुंदर केला आहे. देशात सर्व मुबलक आहे. या सर्व संसाधनांनी देश समृद्ध, श्रीमंत आहे; पण लोक गरीब आहेत. का गरीब आहेत? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगत, अभियंत्यांमध्ये हे गतवैभव प्राप्त करण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. आमदार सावरकर यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले असल्याचे सांगताना अनेक मजेदार किस्से सांगितले. अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या या भागातील विद्यार्थ्यांना याच भागात कामे मिळण्याची गरज आहे. त्यासाठी या भागात मोठी औद्योगिक वसाहत, प्रक्रिया उद्योग, कापूस उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. परंतु, याबाबतीत विदर्भ मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अकोल्यातील रस्ते बांधकाम सुरू असताना या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्या रस्त्यांचे अवलोकन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध विषय, खेळात प्रावीण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन झामरे यांनी, तर आभार प्रदर्शन मालोकार यांनी केले.