शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

पाण्याचे सूक्ष्म व्यवस्थापनच भविष्यात तारणार- संजय बेलसरे

By admin | Updated: September 25, 2015 01:04 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा.

अकोला: जगात सर्वाधिक पाण्याचा साठा आपल्याकडे आहे; परंतु या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पाणीसाठय़ाचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासोबतच पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपसचिव डॉ. संजय बेलसरे यांनी गुरुवारी येथे केले. अकोला अभियंता व वास्तुविद् संघटना आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलाजी अकोलाच्यावतीने गुरुवार, २४ सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बेलसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, संजीव जैन, काशीनाथ खडसे, व्ही.एस. जामोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बेलसरे यांनी या प्रसंगी एका चित्रफितीद्वारे जगातील पाण्याची उपलब्धता आणि नियोजन, या माहितीसह आपल्याकडे वापर होत असलेल्या पाण्याची तुलनात्मक माहिती दिली. अँड. शेळके यांनी अभियांत्रिकी क्षेत्राला अवकळा आली असल्याची वास्तविकता मांडताना, अभियांत्रिकीला चांगले दिवस आणण्याची जबाबदारी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या प्रत्येक अभियंत्याची असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. अभियांत्रिकीला पारंपरिक इतिहास आहे. अभियंत्यांनीच देश सुंदर केला आहे. देशात सर्व मुबलक आहे. या सर्व संसाधनांनी देश समृद्ध, श्रीमंत आहे; पण लोक गरीब आहेत. का गरीब आहेत? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगत, अभियंत्यांमध्ये हे गतवैभव प्राप्त करण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. आमदार सावरकर यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले असल्याचे सांगताना अनेक मजेदार किस्से सांगितले. अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या या भागातील विद्यार्थ्यांना याच भागात कामे मिळण्याची गरज आहे. त्यासाठी या भागात मोठी औद्योगिक वसाहत, प्रक्रिया उद्योग, कापूस उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. परंतु, याबाबतीत विदर्भ मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अकोल्यातील रस्ते बांधकाम सुरू असताना या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्या रस्त्यांचे अवलोकन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध विषय, खेळात प्रावीण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन झामरे यांनी, तर आभार प्रदर्शन मालोकार यांनी केले.