शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

कच-याचे ढीग आणि दुर्गंधीने अकोलावासी हैरान.

संतोष येलकर/अकोलादेशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत असले तरी, अकोला शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला साचलेले कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधीने शहरवासी हैरान झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता मिशनची शहरात ऐसीतैशी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. त्यानुषंगाने सर्वत्र स्वच्छता मिशनची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छतेच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. सगळीकडे स्वच्छतेचा बोलबाला सुरू असताना अकोल्यात मात्र, विविध भागात रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचल्याचे वास्तव रविवारी दिसून आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते टॉवर चौक, भाजी बाजार, बस स्थानकामागील परिसर, फतेह चौक ते दीपक चौक, आकोट स्टॅन्ड व इतर भागात रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले असून, हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. वार्‍याच्या सुसाट्यात रस्त्यांवरून कचरा उडत आहे. उडणारा कचरा डोळ्यात जात आहे. तसेच भाजी बाजार, शासकीय विश्रामगृह समोर व बस स्थानकामागील परिसरात रस्त्यांवर सडका भाजीपाला, हिरव्या नारळाची टरफले, प्लास्टिक पिशव्या, पृष्ठ आणि कागदाचे तुकडे व काडीकचरा कुजत असून, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही असेच असाच अनुभव येत असून, कचर्‍याच्या ढिगांसोबतच मोकाट जनावरांचा मुक्त संचारही सर्रास सुरू आहे. कचर्‍याच्या समस्येने नागरिक हैरान असून, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ते बघता स्वच्छता मिशनचा अकोल्यात बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे.