शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संग्राम प्रकल्पाची श्रेणी घसरली

By admin | Updated: February 18, 2015 01:24 IST

कामगिरी मूल्यांकनात अमरावती विभाग मागे.

बुलडाणा : नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ह्यसंग्राम सॉफ्टह्ण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने याबाबत मूल्यांकन केले असता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबाजावणीची मंद गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याअनुषंगाने कामकाजात सुधारणा करण्यासाठी या जिल्ह्यांना फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.शासनाकडून ग्रामविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतस्तरावरून होत असते. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांसह, जन्मनोंदणी, मृत्यू नोंदणी, रहिवासी दाखला, नोकरी, व्यवसायासाठी नाहरकत दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, नादेय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्र, जॉबकार्ड, शौचालय दाखला, नळजोडणीसाठी परवानगी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला आदी महत्त्वूपर्ण दाखले नागरिकांना तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ई-पंचायतअंतर्गत ह्यसंग्राम सॉफ्टह्ण ही आज्ञावली विकसित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले आहेत. मानधनावर संगणक परिचालकही नियुक्ती करण्यात आले आहेत; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे ह्यसंग्राम सॉफ्टह्ण आज्ञावलीचे १ ते २७ प्रकारचे लेखे ऑनलाइन करणे आणि जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीची कामे मंदगतीने सुरू आहेत. नोव्हेंबर २0१४ मध्ये या जिल्ह्यांच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हे संग्राम सॉफ्टच्या अंमलबजावणीत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. या जिल्ह्यांना कामगिरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.*या आज्ञावलीच्या अंमलबजावणीत राज्यात वाशीम जिल्हा २९ व्या क्रमाकांवर आहे. अकोला जिल्हा २८, बुलडाणा २६, अमरावती २४ आणि यवतमाळ जिल्हा २३ व्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रमाणित अभिलेखे संग्राम सॉफ्टमध्ये भरण्याची कारवाई अत्यंत मंदगतीने होत आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यांतर्गत विवाहाच्या नोंदी अल्पप्रमाणात नोंदविल्या गेल्या.