शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संचमान्यतेमध्ये दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार लिकिंगच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:02 IST

आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे१६ ऑक्टोबरपर्यंत मुदततर शिक्षकांवर अतिरिक्तचे संकट

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: २0१७ व १८ या वर्षाच्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक अपलोड करावे लागत आहे. आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचमान्यतेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आधार लिकिंग होत नसल्याने दरवर्षी अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते. पुढीलवर्षी सुद्धा हे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, मनपा, न.प. सह खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने, शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यातही शासनाने यातील गैरप्रकार रोखण्यासाठी संचमान्यतेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या माहितीसह त्यांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे. परंतु संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा, वर्गाचा समावेश करताना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त ठरण्याची वेळ आपल्यावर येवू यासाठी दृष्टीकोनातून शिक्षक धावपळ करून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिळवून, त्यांचे क्रमांक संचमान्यतेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही वर्गांंमधील अध्र्याधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने, संचमान्यतेमध्ये त्यांचा समावेश करावा तरी कसा? असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एका वर्गातील अध्र्याधिक विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड, त्याचा क्रमांक संचमान्यतेमध्ये समाविष्ट केला नाहीतर शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत आहे. यावर्षी सुद्धा अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांंच्या संख्येअभावी अतिरिक्त ठरावे लागले. २0१७ व १८ च्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंचा समावेश करण्यासाठी शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ दिली आहे.

संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंची आधार लिंकिंग महत्वाची आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ आहे. शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांंचा संचमान्यतेमध्ये समावेश करावा आणि पुढील वर्षी होणारी गैरसोय टाळावी. - प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प. अकोला