शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:44 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला.

ठळक मुद्दे ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही.इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोडस आॅपरेंडीच नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या स्तरावर टीम तयार करून या हत्या घडविण्यात आल्या. त्यामुळेच या हत्यामागे ज्या संस्थांची प्रेरणा अन् प्रोत्साहन होते तिथपर्यंत थेट पोहचता येत नाही, अशी खंत व्यक्त करून त्याचाच फायदा अशा हत्यामध्ये सहभागी संस्था घेत असून, ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात गांधी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे उपस्थित होते. तुषार गांधी पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप त्यांनी केला. गांधी हत्येनंतर कोर्टात खटला उभा राहिल्यावर पुराव्याअभावी या काहींची सुटका झाली असली तरी पुरावे कोर्टासमोर उपलब्ध होणार नाहीत असेच षडयंत्र या मागे रचले गेले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन ‘ते’ आम्ही नव्हेच अशा सांगणाऱ्या संस्था निर्दोषत्व सांगत असल्या तरी त्यांचीच प्रेरणा या हत्येमागे होती हे सिद्ध करण्यास कपूर आयोग महत्त्वाच ठरतो, असे ते म्हणाले. गांधी हत्येप्रमाणेच दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर ज्यांचा विश्वास नाही अशा संस्थांचा या मध्ये सहभाग होता; मात्र हत्येसाठी वेगवेगळ्या पातळीवर नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही. मुंबईचा डॉन दाऊद इब्राहीमसुद्धा अशाच मोडस आॅपरेंडीमुळे पोलिसांच्या हाती लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.महात्मा गांधींनी या देशाला वैचारिक लढा लढण्याची ताकद दिली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एखादे आंदोलन पुकारले की सर्व नेत्यांना अटक केली जात असे; मात्र जनता आंदोलनात कायम राहत गेल्याने स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला यामागे महात्मा गांधींनी दिलेला विचार होता, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी सोबतच कस्तुरबा गांधी यांचेही योगदान तेवढेच तुल्यबळ आहे; मात्र इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रख्यात कवी विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार, विजय विल्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तुषार गांधी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. संचालन चंद्रकांत झटाले यांनी केले. तर प्राचार्य डॉ. भीसे यांनी आभार मानले.

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ