शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

क्षारयुक्त पाणी उठले जीवावर: चतारी येथे किडणीच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:24 IST

निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या.

ठळक मुद्दे निलेश यांना पाच वर्षापूर्वी किडणीचा आजार जडला होता. मुंबई, पुणे व नागपूर येथील रुग्णालयांमध्ये निलेशवर उपचार करण्यात आले. गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी येथे गेल्या दहा वर्षांपासून किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. क्षारयुक्त पाणी येथील ग्रामस्थांच्या जीवावर उठले असून, दहा वर्षात २० जणांचा मृत्यू झाला तर गावातील २० ते २५ ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. किडणीच्या विकारानेग्रस्त असलेल्या चतारी येथील आणखी एका युवकाचा गुरुवारी उपचारादरम्यान अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. अत्यंत हलाखीची परिस्थीत असलेल्या निलेश यांना पाच वर्षापूर्वी किडणीचा आजार जडला होता. या दरम्यान नसतानाही मुंबई, पुणे व नागपूर येथील रुग्णालयांमध्ये निलेशवर उपचार करण्यात आले. ऐपत नसतानाही लाखो रुपये उपचारावर खर्च झाले; परंतु कोणताही फरक पडला नाही. अखेर गत काही दिवसांपासून निलेश यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, व आईवडील असा परिवार आहे.दहा वर्षात २० जणांचा किडणी विकाराने मृत्यूखारपाणपट्ट्यात येत असलेल्या चतारी येथे ग्रामपंचायतच्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. तुलंगा परिसरात असलेल्या एका विहिरीतील पाणी गावातील जलकुंभात साठवून ते ग्रामस्थांना वितरीत करण्यात येते. १० वर्षांपूर्वी या गावात किडनीच्या आजाराची लागण झाली. पोलीस पाटील विजय सरदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर विहिरीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या पाण्यात सिलीका आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने पिण्यासाठी वापरू नये, असा अहवाल नागपुरातील प्रयोगशाळेने दिला. तरीही दहा वर्षांपासून या गावात प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे २० ग्रामस्थांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला तर २० ते २५ जण महागडा उपचार करीत आहेत. गावात कुठेही कुपनलीका खोदल्यास क्षारयुक्त पाणी असल्याने ग्रामस्थांवर विहिरीच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य