शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

रानभाजी महोत्सवात ४५ हजार रुपयांच्या भाज्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 18:11 IST

Ranbhaji Mahotsav : अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मुक्त हस्ते खरेदी केल्याने महोत्सवात ४५ हजार रुपयांची रानभाज्यांची विक्री झाली.

अकोला : राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. अकोला येथे यंदाही प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात रानभाज्या महोत्सव सोमवारी आयोजित करण्यात आला. या महोत्सवास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मुक्त हस्ते खरेदी केल्याने महोत्सवात ४५ हजार रुपयांची रानभाज्यांची विक्री झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ. विठ्ठल वाघ, प्रभारी कृषी उपसंचालक संध्या करवा, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक दिनकर प्रधान, प्रकल्प संचालक डॉ के.बी.खोत,अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तेराणीया, तालुका कृषी अधिकारी दिनकर प्रधान, तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार यांची उपस्थिती होती.

रानभाज्या ह्या आहाराचे पोषणमूल्य वाढवणाऱ्या असतात. तसेच त्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असतात,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले. तसेच शासनाच्या आत्मा, महिला बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या संस्थांनी बचत गटांमार्फत शेतीमाल विक्रीसाठी प्रयत्न करायला हवे,असेही सांगितले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी व्ही.एम शेगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख, सचिन गायगोळ, वरुण दळवी, अर्चना पेठे, संदीप गवई,राहुल अडाणी, दीपक मोगरे,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख यांनी केले.

 

रानभाज्यांचे २० हून अधिक प्रकार उपलब्ध

या महोत्सवात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, अंबाडी, केना, करवंद, चमकुराचे पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबटचुका, वाघाटे, गवती चहा, गोबरु कंद, तांदळजा, सुरण कंद, कुर्डु, गुळवेल, शेवगा आदींसह २० हून अधिक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होत्या. ‘आत्मा’ अंतर्गत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्या खरेदी केल्या. या महोस्तवात उभारण्यात आलेल्या १२ स्टॉल्सवरुन अकोलेकरांनी ४५ हजारांचा भाजीपाला खरेदी केला,अशी माहितीसुत्रांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती